शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या बियाणाची शेतकऱ्यांकडून चाचणी

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

पालम : मृग नक्षत्र संपले तरी पावसाची सुरुवात झालेली नाही़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्ग बियाणे खरेदी करीत आहे़ यावर्षी प्रथमच सोयाबीनच्या बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे़

पालम : मृग नक्षत्र संपले तरी पावसाची सुरुवात झालेली नाही़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्ग बियाणे खरेदी करीत आहे़ यावर्षी प्रथमच सोयाबीनच्या बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे़ बियाणे खरेदी करताना शेतकरी दुकानावरच चाचणी करून खरेदी करीत आहेत़ पालम तालुक्यात मागील वर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता़ परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात निम्म्याने घट झाली होती़ यावर्षीही सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत़ सोयाबीनचा भाव चार हजाराच्या पुढे गेला होता़ शेतकरी वर्ग सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून बघत असतात़ या पिकाला रासायनिक खते व औषधांचा खर्चही कमी येतो़ यावर्षी बाजारपेठेत विविध कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ सोयाबीन बियाणाची टंचाई झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे़ पेरणीच्या तोंडावर बियाणांची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढल्याने भावात वाढ झाली आहे़ दुकानावर सोयाबीनच्या बॅगमधील दाणे काढून शेतकरी उगवण क्षमतेची तपासणी करीत आहेत़ ८० टक्के चाचणीत बियाणे यशस्वी झाले तरच खरेदी केली जात आहे़ पाण्याच्या ग्लासमध्ये बियाणे टाकून थोडावेळ ठेवले जात आहे़ ज्या बियाणावर सुरकुत्या पडतील त्या बियाणाची मोजणी करून उगवण क्षमता ठरविली जात आहे़ ही पद्धत शास्त्रीय असो की नसो शेतकरी मात्र याच चाचणीवरच समाधानी राहत आहेत़ (प्रतिनिधी)घरच्या बियणाचा वापरास धोका बाजारपेठेत यावर्षी बियाणांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे़ शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्यावर भर दिला आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे बियाणे आहे ते शेतकरी पेरणीसाठी विक्री करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाणाच्या उगवण क्षमतेची कोणीच शाश्वती देत नाही़ यामुळे प्रक्रिया न करताच बियाणे पेरल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो़ पावसाची प्रतीक्षाजून महिना पूर्णत: कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ मागील वर्षी सध्याच्या कालावधीच्या काळात पेरणी झालेली होती़ यावर्षी पेरणी अजून किती लांबेल हे सांगणे कठीण आहे़ दररोज आलेला दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढत आहे़ पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे़