शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे महागले

By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST

निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली.

हिंगोली : निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली. गतवर्षी सरसकट कंपन्यांच्या सोयाबीनची एक बॅग १ हजार ७०० रूपयांच्या आत खरेदी केलेल्या उत्पादकांना यंदा कितीही पैसा मोजला तरी सोयाबीनचे प्रमाणित बियाणे मिळणे दुर्मिळ झाले. परिणामी महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ तर इगलसाठी २ हजार ७०० रूपये आजघडीला मोजावे लागत आहेत. सध्याच्या दरात पाऊस पडताच आणखीच वाढ संभवित असल्याने कदाचित अनेक उत्पादकांना कंपन्यांचे बियाणे मिळणार नाही. सोयाबीन काढणीच्यावेळी झालेल्या पावसाने उत्पादकांची माती केली. पिकाच्या नुकसानीबरोबर सोयाबीनला बाधा पोहोचली. पाण्यामुळे स्वपरागसिंचित असलेल्या सोयाबीनच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने घरचे सोयाबीन पेरणीला मर्यादा आली. आता त्याचा फटका सर्वच शेतकर्‍यांना बसताना दिसतो. दरम्यान, शासनाने सोयाबीन बियाणे उत्पादीत करणार्‍या कंपन्यांना सबसिडी दिली नाही. परिणामी भाववाढ अटळ झाल्याने आज उत्पादकांना सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना कर्ज काढण्याची पाळी आली. जवळपास सर्वच उत्पादकांनी सोयाबीनचा पेरा अधिक ठेवल्याने त्याच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली. गतवर्षीच्याच क्षेत्राएवढेही सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध नाही. यंदा झालेल्या वाढीचा प्रश्न कोसो मैैल दूर असल्याने उत्पादकांच्या कपाळावर आठ्या उमटू लागल्या. आतापासूनच हिंगोली शहरातील बियाणे विक्रेत्यांकडे शेतकरी सोयाबीनच्या बियाण्यांची विचारणा करू लागले. पैैसे मोजण्याची तयारी असली तरी विक्रेत्यांकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा सांगण्यात येवू लागला. आजमितीला बाजारात महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ रूपये मोजावे लागत असल्याचे रिटेल विक्रता रितेष अग्रवाल यांनी सांगितले. महाबीजच्या बियाण्यांची ही कथा असताना इगलच्या दरात विक्रमी वाढ झाली. गतवर्षी १ हजार ७०० रूपयांना असणारी बॅग यंदा २ हजार ७०० रूपयांवर गेली. तब्बल १ हजाराची वाढ झाली असताना या बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगतात. आताच ही गत असताना पेरणीच्या वेळी सोयाबीनचे बियाणे मिळण्यासाठी उत्पादकांना कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) उगवणशक्ती तपासून वापरा घरचे बियाणे कपटाच्या खोक्यात माती भरून वापसा होईल एवढे पाणी टाकावे. तद्नंतर या मातीत सोयाबीनचे दाणे मोजून टाकावे. गरजेपुरते पाणी टाकून मातीने झाकावे. आठवड्यानंतर उवगलेले बियाणे मोजावे. त्यानंतर पेरलेले बी आणि उगवलेले बी यांची मोजणी करावी. मोजणीअंती न उगवलेले बियाणे पेरणीच्या वेळी अधिक घ्यावे. याचप्रमाणे पोती भिजून आत मोजून सोयाबीनचे बियाणे टाकावे. त्यानंतर पोती गुंडाळून पाणी टाकावे. काही दिवसांनी पोती उकलून आत उगवलेले बियाणे मोजून उगवणशक्ती तपासता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.