शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

सोयाबीन बियाणे महागले

By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST

निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली.

हिंगोली : निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली. गतवर्षी सरसकट कंपन्यांच्या सोयाबीनची एक बॅग १ हजार ७०० रूपयांच्या आत खरेदी केलेल्या उत्पादकांना यंदा कितीही पैसा मोजला तरी सोयाबीनचे प्रमाणित बियाणे मिळणे दुर्मिळ झाले. परिणामी महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ तर इगलसाठी २ हजार ७०० रूपये आजघडीला मोजावे लागत आहेत. सध्याच्या दरात पाऊस पडताच आणखीच वाढ संभवित असल्याने कदाचित अनेक उत्पादकांना कंपन्यांचे बियाणे मिळणार नाही. सोयाबीन काढणीच्यावेळी झालेल्या पावसाने उत्पादकांची माती केली. पिकाच्या नुकसानीबरोबर सोयाबीनला बाधा पोहोचली. पाण्यामुळे स्वपरागसिंचित असलेल्या सोयाबीनच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने घरचे सोयाबीन पेरणीला मर्यादा आली. आता त्याचा फटका सर्वच शेतकर्‍यांना बसताना दिसतो. दरम्यान, शासनाने सोयाबीन बियाणे उत्पादीत करणार्‍या कंपन्यांना सबसिडी दिली नाही. परिणामी भाववाढ अटळ झाल्याने आज उत्पादकांना सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना कर्ज काढण्याची पाळी आली. जवळपास सर्वच उत्पादकांनी सोयाबीनचा पेरा अधिक ठेवल्याने त्याच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली. गतवर्षीच्याच क्षेत्राएवढेही सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध नाही. यंदा झालेल्या वाढीचा प्रश्न कोसो मैैल दूर असल्याने उत्पादकांच्या कपाळावर आठ्या उमटू लागल्या. आतापासूनच हिंगोली शहरातील बियाणे विक्रेत्यांकडे शेतकरी सोयाबीनच्या बियाण्यांची विचारणा करू लागले. पैैसे मोजण्याची तयारी असली तरी विक्रेत्यांकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा सांगण्यात येवू लागला. आजमितीला बाजारात महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ रूपये मोजावे लागत असल्याचे रिटेल विक्रता रितेष अग्रवाल यांनी सांगितले. महाबीजच्या बियाण्यांची ही कथा असताना इगलच्या दरात विक्रमी वाढ झाली. गतवर्षी १ हजार ७०० रूपयांना असणारी बॅग यंदा २ हजार ७०० रूपयांवर गेली. तब्बल १ हजाराची वाढ झाली असताना या बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगतात. आताच ही गत असताना पेरणीच्या वेळी सोयाबीनचे बियाणे मिळण्यासाठी उत्पादकांना कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) उगवणशक्ती तपासून वापरा घरचे बियाणे कपटाच्या खोक्यात माती भरून वापसा होईल एवढे पाणी टाकावे. तद्नंतर या मातीत सोयाबीनचे दाणे मोजून टाकावे. गरजेपुरते पाणी टाकून मातीने झाकावे. आठवड्यानंतर उवगलेले बियाणे मोजावे. त्यानंतर पेरलेले बी आणि उगवलेले बी यांची मोजणी करावी. मोजणीअंती न उगवलेले बियाणे पेरणीच्या वेळी अधिक घ्यावे. याचप्रमाणे पोती भिजून आत मोजून सोयाबीनचे बियाणे टाकावे. त्यानंतर पोती गुंडाळून पाणी टाकावे. काही दिवसांनी पोती उकलून आत उगवलेले बियाणे मोजून उगवणशक्ती तपासता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.