शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पावसाने उघडीप दिल्याने पेरणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:02 IST

करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस ...

करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीकडे कल वाढला, परंतु मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर देखील दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

१० जूनपर्यंत औरंगाबाद तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. १० जूनपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४७.५ मिमी आहे. मात्र १० जूनपर्यंत ९६.३ मिमी एवढा म्हणजे सरासरीच्या १०६.५ % अशी पावसाची नोंद आहे. जास्त पावसामुळे शेती मशागतीची कामेदेखील खोळंबली होती; मात्र १० जूननंतर औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दोन पैशांचा फायदा होईल अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट

सुरुवातीला रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. अशा शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या व लागवडी करण्यास सुरुवात केली. पेरणी करण्यासाठी अपेक्षित व ओलावा असल्याने कपाशी, मका, मूग, उडीद, तूर आदी पिकांची पेरणी किंवा लागवड या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मात्र १० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने व रोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.

जास्त भाव मिळणाऱ्या पिकांकडे कल

औरंगाबाद तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात कपाशी व मका या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते; मात्र यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांचा कल तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांकडे दिसत असून यावर्षी कपाशी पाठोपाठ मका क्षेत्राच्या लागवडीत मोठी घट होणार आहे.

फोटो ओळ

हिवरा शिवारात अंतर्गत मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी लागवड करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच परिस्थिती औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश गावात आहे.