शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पावसाने उघडीप दिल्याने पेरणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:02 IST

करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस ...

करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीकडे कल वाढला, परंतु मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर देखील दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

१० जूनपर्यंत औरंगाबाद तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. १० जूनपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४७.५ मिमी आहे. मात्र १० जूनपर्यंत ९६.३ मिमी एवढा म्हणजे सरासरीच्या १०६.५ % अशी पावसाची नोंद आहे. जास्त पावसामुळे शेती मशागतीची कामेदेखील खोळंबली होती; मात्र १० जूननंतर औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दोन पैशांचा फायदा होईल अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट

सुरुवातीला रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. अशा शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या व लागवडी करण्यास सुरुवात केली. पेरणी करण्यासाठी अपेक्षित व ओलावा असल्याने कपाशी, मका, मूग, उडीद, तूर आदी पिकांची पेरणी किंवा लागवड या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मात्र १० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने व रोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.

जास्त भाव मिळणाऱ्या पिकांकडे कल

औरंगाबाद तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात कपाशी व मका या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते; मात्र यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांचा कल तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांकडे दिसत असून यावर्षी कपाशी पाठोपाठ मका क्षेत्राच्या लागवडीत मोठी घट होणार आहे.

फोटो ओळ

हिवरा शिवारात अंतर्गत मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी लागवड करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच परिस्थिती औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश गावात आहे.