शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पावसाने उघडीप दिल्याने पेरणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:02 IST

करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस ...

करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीकडे कल वाढला, परंतु मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर देखील दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

१० जूनपर्यंत औरंगाबाद तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. १० जूनपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४७.५ मिमी आहे. मात्र १० जूनपर्यंत ९६.३ मिमी एवढा म्हणजे सरासरीच्या १०६.५ % अशी पावसाची नोंद आहे. जास्त पावसामुळे शेती मशागतीची कामेदेखील खोळंबली होती; मात्र १० जूननंतर औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दोन पैशांचा फायदा होईल अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट

सुरुवातीला रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. अशा शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या व लागवडी करण्यास सुरुवात केली. पेरणी करण्यासाठी अपेक्षित व ओलावा असल्याने कपाशी, मका, मूग, उडीद, तूर आदी पिकांची पेरणी किंवा लागवड या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मात्र १० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने व रोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.

जास्त भाव मिळणाऱ्या पिकांकडे कल

औरंगाबाद तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात कपाशी व मका या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते; मात्र यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांचा कल तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांकडे दिसत असून यावर्षी कपाशी पाठोपाठ मका क्षेत्राच्या लागवडीत मोठी घट होणार आहे.

फोटो ओळ

हिवरा शिवारात अंतर्गत मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी लागवड करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच परिस्थिती औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश गावात आहे.