शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

मानवत : तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.

मानवत : तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे अनेक गावातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण होतात. परंतु, यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. तालुक्यातील कुंभारी, थार, वांगी, हमदापूर, वझूर खुर्द व बु. या गावात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळबंल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यावे हे कळेनासे झाले आहे. पेरणीला उशीर झाल्याने या काळात येणारे एकमात्र पीक म्हणजे बाजरी होय. परंतु या पिकाला आपल्या भागात मागणी नसल्याने त्याला भावही येत नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर बाजारातून कापूस, तूर, मूग, सोयाबीन आदी बियाणे व खते खरेदी करून आणून ठेवले आहे. परंतु पेरणी योग्य पाऊसच नसल्याने ही बियाणे घरातच पडून आहेत. त्यामुळे बी बियाणांचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर अतिरिक्त पडणार आहे. २२ जुलैच्या रात्री झालेला रिमझिम पाऊस पेरणीसाठी उपयुक्त आहे. पावसाने जर आणखी काही काळ दडी मारली तर शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचा हंगाम पूर्णपणे हातून जाण्याची शक्यता आहे, असे झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विंवचनेमध्ये आणखी भर पडणार आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात रिपरिप पाऊस पडत आहे़ काही शेतकरी अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ परंतु, काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ बियाणे उगवले नाही़ यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे़ शेतकरी आजघडीला देशोधडीला लागला आहे़ (वार्ताहर)