शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

६ लाख हेक्टरवर पेरण्या

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

रामेश्वर काकडे, नांदेड दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली.

रामेश्वर काकडे, नांदेडदोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली. यामुळे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५ हजार ५०० हेक्टरवर पेरा झाला असून काही भागात पावसाअभावी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरा झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ६२ हजार ३०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०४ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून एकूण क्षेत्राच्या ११६ टक्के आहे. तूर ५३ हजार ५०० हेक्टर, उडिद १७ हजार ८०० हेक्टर, मूग १६ हजार ५०० हेक्टर, ज्वारी ४८ हजार ९०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यातील परण्या झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी ३१ अखेर १०८ टक्के पेरण्या होऊन पीकेही तोऱ्यात डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे खोळंबल्या आहेत. यासाठी अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतिक्षा बळीराजाला लागली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने अजूनही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ३१ जुलैपर्यंत तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २६२०० हेक्टर, बिलोली ४३००० हेक्टर, मुखेड ३२८०० हे., कंधार ४९३०० हे., लोहा ६४३०० हे., हदगांव ५१९०० हे., भोकर ५४ हजार हेक्टर, देगलूर ४२४०० हे., किनवट ७१७००, मुखेड १८ हजार, हिमायतनगर २७८००, माहूर ३२६००, धर्माबाद २३३००, उमरी २९१००, अर्धापूर १७६००, नायगांव ३९९०० हेक्टर याप्रमाणे जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५५०० हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. एकूण क्षेत्राच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या अधून-मधून बरसत असलेल्या पावसावर शेतकरी पेरण्या आटोपून घेत असले तरी काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी ४० टक्के पेरणी मुखेड तालुक्यात झाली आहे. पावसा तुझे वागणे ़़़सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावाचे नांदेडचे कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या शब्दात यथार्थ वर्णन केले आहे़पावसा तुझे वागणेकोणत्याही तर्कात बसत नाही, आमचे माणसांचे सोड़़़पणजमिनीत चिणल्या जात असलेल्यालाखो-करोडो बियांसाठी तुझ्याडोळ्यात पाण्याचा टिपूसही येऊ नये़़़तू अशी ओलच हरवून बसलास तर खोलवर काहीही ऊतरणार नाही़़़झाडं मुळासहित अन् माणसेमुळाबरहुकूम कोसळतील़़़