शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

६ लाख हेक्टरवर पेरण्या

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

रामेश्वर काकडे, नांदेड दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली.

रामेश्वर काकडे, नांदेडदोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली. यामुळे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५ हजार ५०० हेक्टरवर पेरा झाला असून काही भागात पावसाअभावी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरा झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ६२ हजार ३०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०४ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून एकूण क्षेत्राच्या ११६ टक्के आहे. तूर ५३ हजार ५०० हेक्टर, उडिद १७ हजार ८०० हेक्टर, मूग १६ हजार ५०० हेक्टर, ज्वारी ४८ हजार ९०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यातील परण्या झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी ३१ अखेर १०८ टक्के पेरण्या होऊन पीकेही तोऱ्यात डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे खोळंबल्या आहेत. यासाठी अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतिक्षा बळीराजाला लागली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने अजूनही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ३१ जुलैपर्यंत तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २६२०० हेक्टर, बिलोली ४३००० हेक्टर, मुखेड ३२८०० हे., कंधार ४९३०० हे., लोहा ६४३०० हे., हदगांव ५१९०० हे., भोकर ५४ हजार हेक्टर, देगलूर ४२४०० हे., किनवट ७१७००, मुखेड १८ हजार, हिमायतनगर २७८००, माहूर ३२६००, धर्माबाद २३३००, उमरी २९१००, अर्धापूर १७६००, नायगांव ३९९०० हेक्टर याप्रमाणे जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५५०० हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. एकूण क्षेत्राच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या अधून-मधून बरसत असलेल्या पावसावर शेतकरी पेरण्या आटोपून घेत असले तरी काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी ४० टक्के पेरणी मुखेड तालुक्यात झाली आहे. पावसा तुझे वागणे ़़़सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावाचे नांदेडचे कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या शब्दात यथार्थ वर्णन केले आहे़पावसा तुझे वागणेकोणत्याही तर्कात बसत नाही, आमचे माणसांचे सोड़़़पणजमिनीत चिणल्या जात असलेल्यालाखो-करोडो बियांसाठी तुझ्याडोळ्यात पाण्याचा टिपूसही येऊ नये़़़तू अशी ओलच हरवून बसलास तर खोलवर काहीही ऊतरणार नाही़़़झाडं मुळासहित अन् माणसेमुळाबरहुकूम कोसळतील़़़