शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

साहित्यात वंचितांचा आवाज हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:04 IST

समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : मसापतर्फे औरंगाबादेत करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी (दि.११) त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.‘मसाप’च्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देशमुखांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, गणेश मोहिते आणि रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.‘कलावाद किंवा कलात्मकतेचा विनाकारण अवडंबर माजवू नये. साहित्याने ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना देशमुखांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व विशद केले. न्या. चपळगावकर यांनी साहित्य संमेलनाच्या उत्सवी स्वरुपावर टीका करताना विचारपीठाची संकल्पना मांडली. अध्यक्षांनी भाषणातून मराठी भाषेच्या स्थितीविषयी आग्रहाने बोलावे. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.गुणांवर प्रकाशगणेश मोहिते यांनी देशमुखांच्या साहित्याचा आढावा घेताना त्यांच्या कथेच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ‘कोणत्याही विषयावर संशोधन आणि चिंतन केल्यानंतर जे कथाबीज सापडेल त्यावर दर्जेदार साहित्य निर्माण करणारे देशमुख प्रबोधनाच्या अंगाने लिहितात. उद्याचे जग कसे असेल व असले पाहिजे याविषयी त्यांच्या लिखाणातून प्रतिबिंब उमटते’, असे ते म्हणाले. काळुंखे म्हणाले की, धर्माची चौकट मोडून बाहेर पडणाºया मोजक्या लेखकांमध्ये देशमुखांचा समावेश आहे. देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय विषय आणि राजकारण मराठी साहित्यात उतरविण्याचे श्रेय त्यांना जाते.