शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

साहित्यात वंचितांचा आवाज हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:04 IST

समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : मसापतर्फे औरंगाबादेत करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी (दि.११) त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.‘मसाप’च्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देशमुखांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, गणेश मोहिते आणि रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.‘कलावाद किंवा कलात्मकतेचा विनाकारण अवडंबर माजवू नये. साहित्याने ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना देशमुखांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व विशद केले. न्या. चपळगावकर यांनी साहित्य संमेलनाच्या उत्सवी स्वरुपावर टीका करताना विचारपीठाची संकल्पना मांडली. अध्यक्षांनी भाषणातून मराठी भाषेच्या स्थितीविषयी आग्रहाने बोलावे. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.गुणांवर प्रकाशगणेश मोहिते यांनी देशमुखांच्या साहित्याचा आढावा घेताना त्यांच्या कथेच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ‘कोणत्याही विषयावर संशोधन आणि चिंतन केल्यानंतर जे कथाबीज सापडेल त्यावर दर्जेदार साहित्य निर्माण करणारे देशमुख प्रबोधनाच्या अंगाने लिहितात. उद्याचे जग कसे असेल व असले पाहिजे याविषयी त्यांच्या लिखाणातून प्रतिबिंब उमटते’, असे ते म्हणाले. काळुंखे म्हणाले की, धर्माची चौकट मोडून बाहेर पडणाºया मोजक्या लेखकांमध्ये देशमुखांचा समावेश आहे. देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय विषय आणि राजकारण मराठी साहित्यात उतरविण्याचे श्रेय त्यांना जाते.