शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चौकशी लागताच जादू झाली, गायब झालेली मका गोदामात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:06 IST

वैजापूर : मुदत संपल्याने खरेदी- विक्री संघाने खरेदी केलेली ३४३.५० क्विंटल मका गोदामातून गहाळ झाली होती. या मक्याचे शेतकऱ्यांना ...

वैजापूर : मुदत संपल्याने खरेदी- विक्री संघाने खरेदी केलेली ३४३.५० क्विंटल मका गोदामातून गहाळ झाली होती. या मक्याचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने ते यासाठी पाठपुरावा करीत होते. सदर मका परत देण्याचे आदेश देऊनही सात महिन्यांपासून मका किंवा पैसे मिळण्याची दहा शेतकरी वाट पाहत होते. ही मका गोदामातून गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच खळबळ उडाली. यानंतर सदर शेतकरीही उपोषणास बसले चौकशीचा ससेमिरा लागताच गायब झालेली मका जादुई पद्धतीने पुन्हा गोदामात हजर झाली आहे.

खरेदी- विक्री संघाच्या वतीने २०१९-२० मध्ये मका खरेदी करण्यात आली. शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी बंद केली. खरेदी बंद झाल्यानंतर खरेदी- विक्री संघाने दहा शेतकऱ्यांची ३४३.५० मका खरेदी करून घायगाव येथील भाग्योदय जिनिंगच्या गोदामात ठेवली होती. त्यानंतर ही पूर्ण मका तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. वैजापूर तलाठी सज्जाचे तलाठी जितेंद्र चापानेरकर यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन गोदामाच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. सदर शेतकऱ्यांना मक्याचे पैसे न मिळाल्याने त्यांनी पाठपुरावा केला. नोंदणी नसल्याने पैसे देणे शक्य नसल्याने मका परत करण्याचे आदेश जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिले होते. आदेश देऊनही सात महिन्यांपासून या शेतकऱ्यांना मका मिळाली नव्हती. यानंतर गोदामातून ही मका गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने पुढे आणले. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. यानंतर सदर शेतकरीही उपोषणास बसले होते. यानंतर तहसीलदारांनी तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना नोटीस बजावून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मनोहर वाणी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही चौकशी सुरू झाल्यानंतर अचानक गोदामात ३४६ क्विंटल मका आढळून आली आहे. मका तिथेच होती असा अहवाल वाणी यांनी तहसीलदारांना दिला आहे. मात्र, यात नियोजनबद्ध षडयंत्र असून हे प्रकरण संपविण्यासाठी प्रशासनाकडून ही सारवासारव केली जात आहे.

चौकट

इतके दिवस मका होती कुठे?

मका गायब होण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे या एकंदरीत प्रकरणावरून दिसत आहे. इतके दिवस शेतकऱ्यांना परत करण्यासाठी मका नव्हती. चौकशीचा ससेमिरा मागे लागून हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे स्पष्ट होताच अचानक ही मका गोदामात अवतरली आहे. यात भीतीमुळे दुसरीकडून खरेदी करून येथे मका आणून ठेवल्याची कुजबुज आता तालुक्यातील नागरिक करीत आहेत. प्रशासनाच्या या जादूच्या कांडीचीही सर्वत्र चर्चा होत आहे.