जालना : जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमधील विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून या पदाच्या निवडणुका १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. दरम्यान, चारही नगरपालिकांमध्ये प्रशासकीय नगराध्यक्ष म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा व त्यापाठोपाठ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्याने या दोन्ही निवडणुकांसाठीचा काळ आचारसंहितेत गेल्याने मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील नगराध्यक्षांनी केली होती. त्यावर शासनाने नगराध्यक्ष पदासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला होता. नगराध्यक्षांना जीवदान मिळाले होते. परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर शासनाने नगराध्यक्ष पदाच्या मुदतवाढीचा निर्णय रद्द करून या पदाची निवडणूक घेण्याचे नगरपालिकांना आदेश दिले. त्याप्रमाणे नगराध्यक्षपदाची निवडणूक १६ जुलै रोजी होणार असून त्यासाठी ११ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जालना नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया यांचा कार्यकाळ २६ जून २०१४ रोजी संपलेला आहे. परंतु शासनाने मध्यंतरी दिलेला मुदतवाढीचा निर्णय व आता तो रद्द करण्याचा निर्णय यामुळे ४ जुलैपर्यंतचा कार्यकाळ भरतिया यांच्याकडे होता. नगरविकास खात्याच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय अध्यक्ष म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती केली आहेइच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरुजिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर विविध राजकीय पक्षांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.भोकरदन - नगराध्यक्षा अर्चना चिने यांचा कार्यकाळ संपला असून प्रशासकीय अध्यक्ष म्हणून तहसीलदार रुपा चित्रक यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत याबाबतचे कुठलेही आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले नव्हते. अंबड/परतूर - या दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रशासकीय अध्यक्षांची निवड शनिवारी उशिरापर्यंत झालेली नव्हती.
तूर्त प्रशासकीय नगराध्यक्ष
By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST