शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सोशल मीडियाच्या विळख्यातून स्वत:ला सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:59 IST

सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.जैन टॅग ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पाटणी यांनी ‘यू लिव्ह ओन्ली वन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष ललित पाटणी, मनीषा भन्साली, सोनाली पाटणी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.यानंतर बोलताना डॉ. पाटणी म्हणाले, जीवनामध्ये आनंदी, सुखी, संपन्न राहण्यासाठी प्रत्येकाला भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. भाषा वापरताना त्यात जीव असला पाहिजे. त्याशिवाय प्रत्येक गोष्टीत आनंद मिळत नाही. याचबरोबर प्रत्येक जण आपल्या पाल्यांवर प्रेम करतात. मात्र त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी मागेपुढे पाहिले जाते, असे होऊ नये. कारण उद्या तेच पाल्य आपल्याला वेळ देणार नाहीत. या वेळेच्या बाबतीत सध्या सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीची मालक बनली आहे. मानवाने तंत्रज्ञान निर्माण केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकार्य होणे अपेक्षित होते. मात्र उलटेच घडले. आज तंत्रज्ञानाच्या आहारी मनुष्य गेला आहे. यात माणूस गुलाम आणि तंत्रज्ञान मालक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियात व्हॉटस्अ‍ॅपवर साधा मेसेज पडताच आपण त्याला तात्काळ रिप्लाय देतो. आपल्याकडे यासाठी भरपूर वेळ असतो. मात्र कुटुंब, मुलं, कार्यालयीन काम याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. या मोबाईलच्या गुलामीपासून मुक्त व्हा, मोठे होण्यासाठी सोशल मीडिया सोडावाच लागेल, असेही डॉ. पाटणी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे मंगलचरण जयश्री लोहाडे यांनी म्हटले. श्वेता कासलीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्वेता गंगवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा अनुपमा दगडा, उपाध्यक्षा दीपिका बडजाते, सचिव श्वेता सेठी, स्वाती कासलीवाल, प्रकल्पप्रमुख श्वेता कासलीवाल, पूजा झांझरी, श्वेता गंगवाल, जयश्री लोहाडे, सदस्या रिचा कासलीवाल, रिना ठोले, मोनिका चांदीवाल यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सभागृह खचाखच भरलेले होते.