शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या विळख्यातून स्वत:ला सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:59 IST

सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.जैन टॅग ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पाटणी यांनी ‘यू लिव्ह ओन्ली वन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष ललित पाटणी, मनीषा भन्साली, सोनाली पाटणी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.यानंतर बोलताना डॉ. पाटणी म्हणाले, जीवनामध्ये आनंदी, सुखी, संपन्न राहण्यासाठी प्रत्येकाला भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. भाषा वापरताना त्यात जीव असला पाहिजे. त्याशिवाय प्रत्येक गोष्टीत आनंद मिळत नाही. याचबरोबर प्रत्येक जण आपल्या पाल्यांवर प्रेम करतात. मात्र त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी मागेपुढे पाहिले जाते, असे होऊ नये. कारण उद्या तेच पाल्य आपल्याला वेळ देणार नाहीत. या वेळेच्या बाबतीत सध्या सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीची मालक बनली आहे. मानवाने तंत्रज्ञान निर्माण केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकार्य होणे अपेक्षित होते. मात्र उलटेच घडले. आज तंत्रज्ञानाच्या आहारी मनुष्य गेला आहे. यात माणूस गुलाम आणि तंत्रज्ञान मालक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियात व्हॉटस्अ‍ॅपवर साधा मेसेज पडताच आपण त्याला तात्काळ रिप्लाय देतो. आपल्याकडे यासाठी भरपूर वेळ असतो. मात्र कुटुंब, मुलं, कार्यालयीन काम याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. या मोबाईलच्या गुलामीपासून मुक्त व्हा, मोठे होण्यासाठी सोशल मीडिया सोडावाच लागेल, असेही डॉ. पाटणी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे मंगलचरण जयश्री लोहाडे यांनी म्हटले. श्वेता कासलीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्वेता गंगवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा अनुपमा दगडा, उपाध्यक्षा दीपिका बडजाते, सचिव श्वेता सेठी, स्वाती कासलीवाल, प्रकल्पप्रमुख श्वेता कासलीवाल, पूजा झांझरी, श्वेता गंगवाल, जयश्री लोहाडे, सदस्या रिचा कासलीवाल, रिना ठोले, मोनिका चांदीवाल यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सभागृह खचाखच भरलेले होते.