शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ऑरिकमध्ये नव्या उद्योगासह रेल्वे प्रश्न सोडवा

By | Updated: November 28, 2020 04:04 IST

औरंगाबाद : ऑरिकमध्ये मोठे प्रकल्प आणावेत, ज्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांना नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे सेवेत भर ...

औरंगाबाद : ऑरिकमध्ये मोठे प्रकल्प आणावेत, ज्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांना नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे सेवेत भर घालावी, अशी मागणी औरंगाबाद फर्स्टतर्फे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी यांनी खासदार भागवत कराड यांच्यामार्फत विशेष बैठकीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.

औरंगाबाद फर्स्टने सांगितले की, औरंगाबादमध्ये पिटलाईन, मनमाड ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण, रेल्वे फाटकाजवळ दोन भुयारी मार्ग आणि चार उड्डाणपूल आणि औरंगाबाद सध्या दक्षिण-मध्य रेल्वे क्षेत्रात येतो तो बदलून द्यावा. पंचवटी एक्स्प्रेस आणि नांदेड ते बंगळूर एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत आणाव्यात. ज्यामुळे औरंगाबादची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. त्याशिवाय ऑरिक सिटीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून त्यात नव्या मोठ्या उद्योगांची नितांत आवश्यकता आहे.

त्यावर बोलताना गोयल म्हणाले की, ऑरिक हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लवकरात लवकर मोठ्या प्रकल्पांसाठी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय ज्या रेल्वे औरंगाबादपर्यंत वाढविता येणे शक्य असेल, त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर पिटलाईन आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यासाठी फ्रेटच्या प्रमाणावर अवलंबून आहे. रेल्वे फाटकाजवळ असलेले भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, यात उड्डाणपूल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.