शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

ऑरिकमध्ये नव्या उद्योगासह रेल्वे प्रश्न सोडवा

By | Updated: November 28, 2020 04:04 IST

औरंगाबाद : ऑरिकमध्ये मोठे प्रकल्प आणावेत, ज्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांना नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे सेवेत भर ...

औरंगाबाद : ऑरिकमध्ये मोठे प्रकल्प आणावेत, ज्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांना नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे सेवेत भर घालावी, अशी मागणी औरंगाबाद फर्स्टतर्फे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी यांनी खासदार भागवत कराड यांच्यामार्फत विशेष बैठकीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.

औरंगाबाद फर्स्टने सांगितले की, औरंगाबादमध्ये पिटलाईन, मनमाड ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण, रेल्वे फाटकाजवळ दोन भुयारी मार्ग आणि चार उड्डाणपूल आणि औरंगाबाद सध्या दक्षिण-मध्य रेल्वे क्षेत्रात येतो तो बदलून द्यावा. पंचवटी एक्स्प्रेस आणि नांदेड ते बंगळूर एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत आणाव्यात. ज्यामुळे औरंगाबादची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. त्याशिवाय ऑरिक सिटीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून त्यात नव्या मोठ्या उद्योगांची नितांत आवश्यकता आहे.

त्यावर बोलताना गोयल म्हणाले की, ऑरिक हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लवकरात लवकर मोठ्या प्रकल्पांसाठी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय ज्या रेल्वे औरंगाबादपर्यंत वाढविता येणे शक्य असेल, त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर पिटलाईन आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यासाठी फ्रेटच्या प्रमाणावर अवलंबून आहे. रेल्वे फाटकाजवळ असलेले भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, यात उड्डाणपूल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.