शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

एकमेव आधार कोरोनाने नेला; या पालकांना मदत कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:04 IST

केंद्र व राज्य शासनाची निराधार पाल्यांना मदत करण्याची घोषणा राम शिनगारे औरंगाबाद : देशात शेकडो मुलांचे आई-वडील कोरोनाच्या महामारीत ...

केंद्र व राज्य शासनाची निराधार पाल्यांना मदत करण्याची घोषणा

राम शिनगारे

औरंगाबाद : देशात शेकडो मुलांचे आई-वडील कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावले आहेत. या निराधार झालेल्या पाल्यांना केंद्र आणि राज्य शासनाने आर्थिक मदतीसह शैक्षणिक मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी योजनाही बनविण्यात येत आहे. हे सकारात्मक पाऊल असतानाच ज्या कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा, मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला, अशा मुलांच्या पालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पालकांनी कोणाच्या मदतीने उर्वरित आयुष्य घालवावे, त्यांना आर्थिक, मानसिक, आरोग्य, आदी बाबतीत कोण मदतीचा हात पुढे करणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्यानंतर याविषयी राज्य शासनानेही मदतीची योजना जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा खर्च बालसंगोपन योजनेतून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नातेवाईक या बालकाचे संगोपन करण्यास तयार असल्यास त्यांना महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतून अनुदानही देण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय असतानाच ज्या वयोवृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा, मुलगी कोरोनाने हिरावून घेतली आहे, त्या माता-पित्यांना मदत कोण करणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य शासनाने अशा पालकांविषयीही योजना जाहीर करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

पॉईंटर्स (ही आकडेवारी सोमवारची आहे, आज सायंकाळी मिळाल्यास बदल करता येईल)

कोरोनाचे एकूण रुग्ण : १,४३,९४६

बरे झालेले : १,३८,४१६

सध्या उपचार घेत असलेले : २२४६

एकूण मृत्यू : ३२८४

बॉक्स

ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वेगळेच असतात. हे प्रश्न मुलगा किंवा मुलगी असतानाही सोडविताना संबंधितांची दमछाक होत असते. मात्र, कमावता मुलगा गेल्यामुळे बाहेरील कोणीही या ज्येष्ठांचे संगोपन करताना प्रश्न अधिक जटिल होऊन जातात. यात सामाजिक, मानसिक आरोग्य, याशिवाय विविध आजारांचा समावेश होतो. वृद्ध व्यक्तींना काही सवयी असतात. त्या सवयी या काळातील नवतरुणांना चुकीच्या वाटतात. यातूनही अनेक समस्या निर्माण होत आहेत.

बॉक्स

अशा पालकांना अर्थसाहाय्याची गरज

संरक्षण क्षेत्र वगळता कोणत्याच विभागात मुलगा गमावल्यानंतर आई-वडिलांना मदत करण्याची योजना नाही किंवा तरतूद केलेली नाही. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांप्रमाणेच कमावता एकमेव मुलगा मरण पावलेल्या आई-वडिलांनाही आर्थिक साहाय्य झाले पाहिजे. त्यांच्या देखभालीचे नियोजन केले पाहिजे, तरच अशा पालकांना आधार मिळेल. त्यांचे आगामी काळातील जगणे सुसह्य होईल, अशी आशा आहे,

- दीपक नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते