शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

वाळूजचा पाणी पुरवठा पंधरा दिवसांनंतर सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:16 IST

वाळूज येथील विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांनंतर सोमवारी गावातील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.

वाळूज महानगर : वाळूज येथील विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांनंतर सोमवारी गावातील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीवरुन विद्युत पंप पंधरा दिवसापुर्वी नादूरुस्त झाला होता. त्यामुळे अविनाश कॉलनी, समता कॉलनी, दत्त कॉलनी, शिवाजीनगर व नवीन वसाहतीतील पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घ्यावे लागत होते. वापरासाठी पाणी नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी वर्गणी गोळा करुन टँकरने विकत पाणी घेतले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसी प्रशासनाकडून यापूर्वीच जवळपास ५० टक्के कपात करण्यात आल्याने गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे.

दरम्यान, नादुरुस्त झालेल्या विद्युत पंप दुरुस्त करण्यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लागला. गरवारे उद्योग समुहाकडे दररोज जवळपास ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे पाण्यासाठी होणारी भटकंती काही प्रमाणात थांबली आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सतत कोलमडत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यात कपात झाल्यामुळेच गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचा दावा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी करीत आहे. नियोजनाभआवी गावात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाल्याचे नामदेव इले, शेख युसुफ व त्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater transportजलवाहतूक