शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

सोलापूर-धुळे महामार्ग ऑगस्टअखेरीस वाहतुकीसाठी होणार खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा १२४ कि.मी. लांबीचा सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (जुना रा.म. २११) पूर्ण क्षमतेने ऑगस्टअखेरपर्यंत ...

औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा १२४ कि.मी. लांबीचा सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (जुना रा.म. २११) पूर्ण क्षमतेने ऑगस्टअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी या महामार्गाच्या कामाची पाहणी करताना, करोडी येथे होणाऱ्या टोलनाक्याबाबत काही सूचना केल्या.

सध्या या मार्गाचे काम ९० टक्के पूर्ण असून, ऑगस्टअखेरीस काम पूर्णत्वास जाईल, असा दावा एनएचएआय अधिकाऱ्यांनी केला. महामार्गाच्या कामासाठी असलेले मजूर, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे काम संथगतीने सुरू आहे. या मजूर, कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाशी एनएचएचआयने पत्रव्यवहार केला आहे.

करोडी येथे प्रस्तावित टोल प्लाझासाठी संपादित केलेल्या जागेची पाहणी करीत, टोल प्लाझावर वाहनधारकांसाठी स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, फास्ट टॅग सुविधा उपलब्ध करण्याची सूचना केली.

औरंगाबाद ते करोडी या ३० कि.मी.च्या कामाला ५१३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महामार्ग लवकर वाहतुकीस खुला झाल्यानंतर शहरामधील बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक नवीन रस्त्याने वळविणे शक्य होणार आहे.

महामार्गाचे काम एल अ‍ॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत होत आहे. मुरमा ते औरंगाबाद हे ३८ कि.मी., करोडी ते तेलवाडी हे ५६ कि.मी. अंतर मिळून एकूण ९४ कि.मी. काम पूर्ण झाल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

औरंगाबाद ते शिर्डी १० मीटरचा होणार

औरंगाबाद (करोडी ते शिर्डी) या ८० कि.मी. लांबीच्या रस्त्याची रुंदी ७ मीटरवरून १० मीटर करण्यात येणार असून, त्यासाठीची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाची आवश्यकता नाही. या रुंदीकरणासाठीचा डीपीआर त्वरित बनवून सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.