शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

तेरणा नदीतून मातीचा बेसुमार उपसा

By admin | Updated: May 22, 2014 00:11 IST

लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी जवळून वाहणार्‍या तेरणा नदी पात्रातून मातीचा बेसुमार उपसा केला जात आहे़

लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी जवळून वाहणार्‍या तेरणा नदी पात्रातून मातीचा बेसुमार उपसा केला जात आहे़ कोणत्याही परवानगीशिवाय केल्या जात असलेल्या उपशामुळे नदीकाठावरील वनराईतील वृक्षांची कत्तलही सुरु आहे़ याबाबत महसूल विभागाने पाटबंधारे विभागास कारवाईच्या सूचना करुनही त्याकडे डोळेझाक केली गेली़ औराद शहाजानीनजीक तेरणा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ या बंधार्‍याच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात वनराईची झाडे आहेत़ परंतु, एका खाजगी ठेकेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय नदीपात्रातील मातीचा बेसुमार उपसा केला आहे़ या मातीसाठी ठेकेदाराकडून नदीकाठावरील वनराईच्या वृक्षांची कत्तलही केली गेली आहे़ हा प्रकार महिन्याभरापासून अव्याहतपणे सुरू असताना पाटबंधारे विभागाने मात्र त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केलेली दिसते आहे़ यासंदर्भात निलंगा लोकलढा समितीच्या पदाधिकार्‍यांनी महसूल विभागाकडे तक्रार करुन हा प्रकार थांबविण्याची मागणी दीड महिन्यांपूर्वीच केली होती़ नदीपात्राशेजारील वनराईतील तब्बल ३०० हून अधिक झोडे तोडण्यात आल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे़ मात्र निवडणुकांमुळे महसूल विभागातील अधिकार्‍यांपर्यंत ही तक्रार पोहोचण्यास विलंब झाला़ दरम्यान, मतमोजणी होताच दुसर्‍या दिवशी निलंग्याच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी पाटबंधारे विभाग व वन विभागास नैसर्गिक गौण खनिजाच्या हानीबाबत कळवून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे केल्या़ तक्रारदारांनी गौण खनिज उपशामुळे नदीपात्राची दिशा बदलत असून, त्यामुळे तोंडावर आलेल्या पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पाण्याचा प्रवाह बदलून नदीशेजारील शेकडो हेक्टर जमिनीचे नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली आहे़ त्यांनी याबाबत दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे़ त्यानुसार उपविभागीय अधिकार्‍यांनी कारवाईच्या सूचना केल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली आहे़ त्यांनी पाहणी करुन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अहवाल पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे़ (प्रतिनिधी) पाटबंधारे विभागाचे औरादशहाजानी येथील अभियंता गोरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे सांगून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवीत असल्याचे सांगितले़ तर त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी सोनकांबळे यांनी पाहणी केलेली असून, मातीचा उपसा झाल्याचे मान्य केले़ हा उपसा मंगळवारी थांबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ मातीच्या उपश्यामुळे नदीकाठच्या तीन-चार झाडांचे नुकसान झाले आहे़ परंतु, तक्रारदरार म्हणतात इतक्या झाडांचे नुकसान झाले नसल्याचे सोनकांबळे म्हणाले़