शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

तेरणा नदीतून मातीचा बेसुमार उपसा

By admin | Updated: May 22, 2014 00:11 IST

लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी जवळून वाहणार्‍या तेरणा नदी पात्रातून मातीचा बेसुमार उपसा केला जात आहे़

लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी जवळून वाहणार्‍या तेरणा नदी पात्रातून मातीचा बेसुमार उपसा केला जात आहे़ कोणत्याही परवानगीशिवाय केल्या जात असलेल्या उपशामुळे नदीकाठावरील वनराईतील वृक्षांची कत्तलही सुरु आहे़ याबाबत महसूल विभागाने पाटबंधारे विभागास कारवाईच्या सूचना करुनही त्याकडे डोळेझाक केली गेली़ औराद शहाजानीनजीक तेरणा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ या बंधार्‍याच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात वनराईची झाडे आहेत़ परंतु, एका खाजगी ठेकेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय नदीपात्रातील मातीचा बेसुमार उपसा केला आहे़ या मातीसाठी ठेकेदाराकडून नदीकाठावरील वनराईच्या वृक्षांची कत्तलही केली गेली आहे़ हा प्रकार महिन्याभरापासून अव्याहतपणे सुरू असताना पाटबंधारे विभागाने मात्र त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केलेली दिसते आहे़ यासंदर्भात निलंगा लोकलढा समितीच्या पदाधिकार्‍यांनी महसूल विभागाकडे तक्रार करुन हा प्रकार थांबविण्याची मागणी दीड महिन्यांपूर्वीच केली होती़ नदीपात्राशेजारील वनराईतील तब्बल ३०० हून अधिक झोडे तोडण्यात आल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे़ मात्र निवडणुकांमुळे महसूल विभागातील अधिकार्‍यांपर्यंत ही तक्रार पोहोचण्यास विलंब झाला़ दरम्यान, मतमोजणी होताच दुसर्‍या दिवशी निलंग्याच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी पाटबंधारे विभाग व वन विभागास नैसर्गिक गौण खनिजाच्या हानीबाबत कळवून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे केल्या़ तक्रारदारांनी गौण खनिज उपशामुळे नदीपात्राची दिशा बदलत असून, त्यामुळे तोंडावर आलेल्या पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पाण्याचा प्रवाह बदलून नदीशेजारील शेकडो हेक्टर जमिनीचे नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली आहे़ त्यांनी याबाबत दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे़ त्यानुसार उपविभागीय अधिकार्‍यांनी कारवाईच्या सूचना केल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली आहे़ त्यांनी पाहणी करुन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अहवाल पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे़ (प्रतिनिधी) पाटबंधारे विभागाचे औरादशहाजानी येथील अभियंता गोरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे सांगून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवीत असल्याचे सांगितले़ तर त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी सोनकांबळे यांनी पाहणी केलेली असून, मातीचा उपसा झाल्याचे मान्य केले़ हा उपसा मंगळवारी थांबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ मातीच्या उपश्यामुळे नदीकाठच्या तीन-चार झाडांचे नुकसान झाले आहे़ परंतु, तक्रारदरार म्हणतात इतक्या झाडांचे नुकसान झाले नसल्याचे सोनकांबळे म्हणाले़