शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअरने निवडले ‘पेट’ परीक्षेचे प्रश्न

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (पेट-४) प्रश्नपत्रिका न काढता सॉफ्टवेअरने विचारलेलेच प्रश्न सोडवावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (पेट-४) प्रश्नपत्रिका न काढता सॉफ्टवेअरने विचारलेलेच प्रश्न सोडवावे लागले. यात मुख्य विषयातील विविध उपविषयांच्या दिलेल्या अभ्यासक्रमापैकी एकाच विषयाचे सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे उपविषयांच्या भारांकालाच (सर्व उपविषयांना समान मूल्य देणे) फाटा दिल्याचे स्पष्ट झाले. सर्व विद्यार्थ्यांना समान काठीण्य पातळीचे प्रश्न विचारण्यात आले नाहीत. यातच ऐनवेळी निगेटिव्ह गुण देण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.विद्यापीठ प्रशासनाने प्रयोगांवर प्रयोगाची मालिका सुरूच ठेवली आहे. पदव्युत्तर प्रवेशासाठी विषयानुसार सीईटी न घेता थेट विद्याशाखेनुसार घेतली. यातही विधि शाखेला प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना भलत्याच शाखेची प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. हा गोंधळ कमी होत नाही तोच पेट-४ मधील गोंधळ समोर आला आहे. पेट-४ परीक्षा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १७ परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. मात्र, या परीक्षेत प्राध्यापकांनी सेट केलेल्या प्रश्नपत्रिकांद्वारे प्रश्न विचारण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. ५९ विषयांसाठी घेण्यात आलेल्या पेट परीक्षेसाठी सर्व विषयांच्या प्राध्यापकांकडून प्रश्न मागविण्यात आले होते. या प्रश्नाची विषयांनुसार ‘क्वश्चन बँक’ तयार केली. एका विषयाच्या हजार प्रश्नांचे एकत्रीकरण केल्यानंतर त्यातील ५०-५० प्रश्नांचे गट करण्यात आले. या गटातील प्रश्न सॉफ्टवेअरनेच विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारले असल्याचे अधिष्ठातांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. यात एका विषयातील उपविषयांचे समान प्रश्न विचारण्यात आले नाहीत.उदाहरणार्थ, अर्थशास्त्र विषयातील सूक्ष्म, स्थूल, भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या शाखांचे किरकोळ प्रश्न विचारण्यात आल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. मात्र, याच विषयातील सांख्यिकीय अर्थशास्त्राचे तब्बल १०० पैकी ५० पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले. यामुळे विद्यापीठाने पेट परीक्षेची घोषणा केल्यानंतर जाहीर केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व उपविषयांना दिलेल्या भारांकालाच हरताळ फासण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.