शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याच्या पैशांचे संथगतीने वाटप

By admin | Updated: July 14, 2016 01:34 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६ कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. महिना उलटला तरी अजूनही ५१७ कोटी रुपयांचा निधी बँकांमध्ये पडून आहे.मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे खरीप आणि रबीची पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. विभागातील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा विमा उतरविला होता, त्या सर्वांनाच विम्याच्या लाभाची रक्कम मंजूर झाली आहे. गतवर्षीची ही रक्कम दीड महिन्यापूर्वीच कंपनीकडून त्या त्या जिल्ह्यांना मिळाली. मात्र या रकमेचे शेतकऱ्यांना संथगतीने वाटप सुरू आहे. आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. जालना आणि बीड जिल्ह्यांतही पीकविम्याच्या पूर्ण रकमेचे वाटप झालेले नाही. जालना जिल्ह्यासाठी एकूण ४३१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला. त्यापैकी आतापर्यंत २९४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. १३७ कोटी रुपये अजूनही बँकांमध्ये पडून आहेत. बीड जिल्ह्यातही अजून ३३८ कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. बीड जिल्ह्यासाठी तब्बल ८९२ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत ५५४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांकडे कामाचा ताण असल्यामुळेच या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे; परंतु हे जुलै अखेरपर्यंत हे वाटप पूर्ण होईल असा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.