शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

पीकविम्याच्या पैशांचे संथगतीने वाटप

By admin | Updated: July 14, 2016 01:34 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६ कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. महिना उलटला तरी अजूनही ५१७ कोटी रुपयांचा निधी बँकांमध्ये पडून आहे.मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे खरीप आणि रबीची पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. विभागातील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा विमा उतरविला होता, त्या सर्वांनाच विम्याच्या लाभाची रक्कम मंजूर झाली आहे. गतवर्षीची ही रक्कम दीड महिन्यापूर्वीच कंपनीकडून त्या त्या जिल्ह्यांना मिळाली. मात्र या रकमेचे शेतकऱ्यांना संथगतीने वाटप सुरू आहे. आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. जालना आणि बीड जिल्ह्यांतही पीकविम्याच्या पूर्ण रकमेचे वाटप झालेले नाही. जालना जिल्ह्यासाठी एकूण ४३१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला. त्यापैकी आतापर्यंत २९४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. १३७ कोटी रुपये अजूनही बँकांमध्ये पडून आहेत. बीड जिल्ह्यातही अजून ३३८ कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. बीड जिल्ह्यासाठी तब्बल ८९२ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत ५५४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांकडे कामाचा ताण असल्यामुळेच या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे; परंतु हे जुलै अखेरपर्यंत हे वाटप पूर्ण होईल असा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.