शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

पीकविम्याच्या पैशांचे संथगतीने वाटप

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६ कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. महिना उलटला तरी अजूनही ५१७ कोटी रुपयांचा निधी बँकांमध्ये पडून आहे.मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे खरीप आणि रबीची पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. विभागातील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा विमा उतरविला होता, त्या सर्वांनाच विम्याच्या लाभाची रक्कम मंजूर झाली आहे. गतवर्षीची ही रक्कम दीड महिन्यापूर्वीच कंपनीकडून त्या त्या जिल्ह्यांना मिळाली. मात्र या रकमेचे शेतकऱ्यांना संथगतीने वाटप सुरू आहे. आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. जालना आणि बीड जिल्ह्यांतही पीकविम्याच्या पूर्ण रकमेचे वाटप झालेले नाही. जालना जिल्ह्यासाठी एकूण ४३१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला. त्यापैकी आतापर्यंत २९४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. १३७ कोटी रुपये अजूनही बँकांमध्ये पडून आहेत. बीड जिल्ह्यातही अजून ३३८ कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. बीड जिल्ह्यासाठी तब्बल ८९२ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत ५५४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांकडे कामाचा ताण असल्यामुळेच या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे; परंतु हे जुलै अखेरपर्यंत हे वाटप पूर्ण होईल असा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.