शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

समाज कल्याणची पत्रे वाटप योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:26 IST

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना पत्रे वाटप करण्यात येतात़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील घोटाळ्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून समाजकल्याणचे पत्रे वाटप ठप्प आहे़ विशेष घटक योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना दिला जातो़ मागील दोन वर्षांपासून पत्रे वाटप करण्यात आले नसूल ३ हजार ७६१ लाभार्थी वंचित राहीले आहेत़ समाजकल्याणच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना लोखंडी पत्रे वाटप केले जातात़ २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात समाजकल्याण विभागाने एकाही लाभार्थ्यांना पत्रे वाटप केले नाही़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील झालेला भ्रष्टाचार व त्या अनुषंगाने संबंधितांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे याचा विचार करता, लातूर जिल्हा परिषदेने २०१४-१६ अंतर्गत १ कोटी २२ लाख रुपयांच्या पत्रे वाटपासाठी सर्वसाधारण सभेकडून मंजूरीही मिळविली़ पण या ना त्या कारणाने विशेष घटक योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे पत्रे अद्यापही वाटप केले नाहीत़ परिणामी, लातूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना पत्र्यांचा लाभ मिळाला नाही़ जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून रितसर आर्थिक तरतूद करूनही पत्रे वाटपाची प्रक्रिया मात्र धिम्या गतीने सुरु आहे ़ दोन वर्षाचे सुमारे ३ हजार ७६१ लाभार्थी पत्र्यांपासून वंचित आहेत़ पारदर्शकतेच्या नावाखाली प्रक्रिया क्लीष्ट पद्धतीने राबविण्यात येत आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांचा पत्रे वाटपाचा प्रश्न रखडला आहे़ (प्रतिनिधी)