शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

समाज कल्याणची पत्रे वाटप योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:26 IST

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना

लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना पत्रे वाटप करण्यात येतात़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील घोटाळ्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून समाजकल्याणचे पत्रे वाटप ठप्प आहे़ विशेष घटक योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना दिला जातो़ मागील दोन वर्षांपासून पत्रे वाटप करण्यात आले नसूल ३ हजार ७६१ लाभार्थी वंचित राहीले आहेत़ समाजकल्याणच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना लोखंडी पत्रे वाटप केले जातात़ २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात समाजकल्याण विभागाने एकाही लाभार्थ्यांना पत्रे वाटप केले नाही़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील झालेला भ्रष्टाचार व त्या अनुषंगाने संबंधितांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे याचा विचार करता, लातूर जिल्हा परिषदेने २०१४-१६ अंतर्गत १ कोटी २२ लाख रुपयांच्या पत्रे वाटपासाठी सर्वसाधारण सभेकडून मंजूरीही मिळविली़ पण या ना त्या कारणाने विशेष घटक योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे पत्रे अद्यापही वाटप केले नाहीत़ परिणामी, लातूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना पत्र्यांचा लाभ मिळाला नाही़ जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून रितसर आर्थिक तरतूद करूनही पत्रे वाटपाची प्रक्रिया मात्र धिम्या गतीने सुरु आहे ़ दोन वर्षाचे सुमारे ३ हजार ७६१ लाभार्थी पत्र्यांपासून वंचित आहेत़ पारदर्शकतेच्या नावाखाली प्रक्रिया क्लीष्ट पद्धतीने राबविण्यात येत आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांचा पत्रे वाटपाचा प्रश्न रखडला आहे़ (प्रतिनिधी)