शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

सामाजिक परिवर्तनाचे काम साहित्यातून

By admin | Updated: February 2, 2015 01:14 IST

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले. रविवारी मराठवाडा साहित्य परिषद व छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.येथील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. गोपीनाथ मुुंडे नगरीत हे संमेलन होत आहे. प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे अध्यक्षस्थानी होते. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश साळुंके, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. देशमुख म्हणाले, साहित्यातून अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याचे बळ मिळते. अशा संमेलनातून ग्रामीण लेखक, कवींना वाव मिळण्यास मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. राजपंखे म्हणाले, संमेलनातून समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब उमटते. मसापच्या पुढाकारातून पार पडत असलेल्या या संमेलनाने परिवर्तनाचा जागर होत आहे. शब्दांच्या अविष्काराची ही मैफिल नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. ‘घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना पुन्हा जाळले पाहिजे’ ही गजल त्यांनी सादर केली. त्याला उपस्थितांनी दाद दिली.आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, डॉ. साळुंके यांची भाषणे झाली.दरम्यान, दिवसभर संमेलनात विविध कार्यक्रम पार पडले. संमेलन स्थळी पुस्तकांचे स्टॉल लागले होते. दुपारच्या सुटीमध्ये व सकाळी येथे गर्दी झाली होती. (वार्ताहर)संमेलनापूर्वी सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यावरुन दिंंडी वसंत महाविद्यालयात पोहोचली. यावेळी भजनी मंडळ, कलशधारी मुली, विविध वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी होते. त्यांनी केजकरांचे लक्ष वेधले. व्यंकटराव राऊत, समाधान शर्मा, श्रीराम जोशी, रघूनाथ चौरे, प्राचार्य डॉ. गौतम पाटील, लक्ष्मण डोईफोडे यांची उपस्थिती होती.