शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक परिवर्तनाचे काम साहित्यातून

By admin | Updated: February 2, 2015 01:14 IST

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले. रविवारी मराठवाडा साहित्य परिषद व छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.येथील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. गोपीनाथ मुुंडे नगरीत हे संमेलन होत आहे. प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे अध्यक्षस्थानी होते. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश साळुंके, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. देशमुख म्हणाले, साहित्यातून अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याचे बळ मिळते. अशा संमेलनातून ग्रामीण लेखक, कवींना वाव मिळण्यास मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. राजपंखे म्हणाले, संमेलनातून समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब उमटते. मसापच्या पुढाकारातून पार पडत असलेल्या या संमेलनाने परिवर्तनाचा जागर होत आहे. शब्दांच्या अविष्काराची ही मैफिल नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. ‘घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना पुन्हा जाळले पाहिजे’ ही गजल त्यांनी सादर केली. त्याला उपस्थितांनी दाद दिली.आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, डॉ. साळुंके यांची भाषणे झाली.दरम्यान, दिवसभर संमेलनात विविध कार्यक्रम पार पडले. संमेलन स्थळी पुस्तकांचे स्टॉल लागले होते. दुपारच्या सुटीमध्ये व सकाळी येथे गर्दी झाली होती. (वार्ताहर)संमेलनापूर्वी सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यावरुन दिंंडी वसंत महाविद्यालयात पोहोचली. यावेळी भजनी मंडळ, कलशधारी मुली, विविध वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी होते. त्यांनी केजकरांचे लक्ष वेधले. व्यंकटराव राऊत, समाधान शर्मा, श्रीराम जोशी, रघूनाथ चौरे, प्राचार्य डॉ. गौतम पाटील, लक्ष्मण डोईफोडे यांची उपस्थिती होती.