शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आतापर्यंत तरी भागले, उत्पन्नच नसल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांचे होणार पगाराचे वांधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : आतापर्यंत तरी भागले, कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे एस. टी.चे उत्पन्न पूर्णपणे थांबले असून, भविष्यात एस. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : आतापर्यंत तरी भागले, कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे एस. टी.चे उत्पन्न पूर्णपणे थांबले असून, भविष्यात एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांधे झाल्याशिवाय राहणार नाहीत.

सध्या एस. टी. महामंडळाचे उत्पन्न नसल्यात जमा आहे. अशास्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने एस. टी. महामंडळाला एक हजार कोटी रुपये दिल्याने मार्च आणि एप्रिल महिन्याच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, लॉकडाऊन वाढत गेल्यास आणि उत्पन्न बंदच राहिल्यास या कर्मचाऱ्यांचे पगार करणे अवघड होणार आहे.

............................................

जिल्ह्यातील एस. टी.ची एकूण आगार - ८

एकूण कर्मचारी संख्या - २९००

महिन्याला पगारावर होणारा खर्च - ५ कोटी

सध्याचे रोजचे उत्पन्न - शून्य.

...........................................

कोणाकडे किती थकबाकी

आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी महामंडळाने पुरवलेल्या बस पोटीचे ७६ हजार रुपये महसूल विभागाकडून येणे.

निवडणुकांच्या काळात मतदान पेट्यांची ने-आण करण्यासाठी बसेस पुरविण्यात आल्या होत्या. त्याचे पैसे वसूल झालेले नाहीत.

....................................

...तर पगार होणे अवघड

राज्य शासनाने एक हजार कोटींची मदत केल्यामुळे आतापर्यंत तरी चिंता नव्हती. परंतु, आता उत्पन्नच घटल्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगार होणेसुद्धा अवघड होऊ शकते.

- अरूण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

....................................

मानव विकास मिशनकडून १९७ कोटी

ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरिता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देणे या योजनेंतर्गत एस. टी. महामंडळाच्या बसेसच्या आवर्ती खर्चाचे २०१३ ते २०२० या कालावधीतील ४२८ कोटी ८८ लाख ६२ हजार २०० रुपये मानव विकास विकास मिशन, औरंगाबादतर्फे देण्याचा निर्णय झाला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९७ कोटी ५८ लाख चार हजार रुपये तसेच एस. टी.च्या बसेसमधून कर्तव्यार्थ प्रवास करणारे पोलीस, कारागृह कर्मचारी व कैदी यांच्या प्रवास खर्चापोटी २०१२ ते २०२० या कालावधीतील एकूण ६६ कोटी ६ लाख ४ हजार ४९४ रुपयेही प्राप्त झाल्याने उत्पन्न बुडाले असले तरी एस. टी. कर्मचाऱ्यांचे सध्या पगाराचे वांधे झालेले नाहीत. शिवाय मालवाहतुकीतून एस. टी.ला वर्षभरात ५६ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.