शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘स्मार्ट सिटी’मुळे शहराची आधुनिकतेच्या दिशेने प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:04 IST

केंद्र आणि राज्य शासनाकडून आतापर्यंत ४४१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातील ३४६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. केंद्र ...

केंद्र आणि राज्य शासनाकडून आतापर्यंत ४४१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातील ३४६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाने ठरल्याप्रमाणे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनला निधीही दिला. बोर्डाला विविध विकासाची कामे पूर्ण करता आली. स्मार्ट सिटी योजनेच्या प्रारंभी हाती घेण्यात आलेले ‘एमएसआय’चे काम आता सुरू होत आहे. शहरात ७५० सीसीटीव्ही कॅमेरे, ५० डिस्प्ले बोर्ड, वाहतुकीचे नियम पाळले जावेत, याकरिता रस्त्यावर आयकॅट, झेब्रा क्रॉसिंग, वाहतुकीचे नियम दर्शविणारे फलक, ठिकठिकाणी मार्ग दर्शविणारे फलक, सीसीटीव्हीवरून वॉच ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय कमांड कंट्रोल रूम उभारणे आदी कामे यातून केली. त्याकरिता १७६ कोटींचा खर्च करण्यात आला. सफारी पार्कचा शहरासाठी आवश्‍यक असलेला प्रकल्पदेखील स्मार्ट सिटीतून घेण्यात आला. शहर बससाठी दीडशे अँड्रॉईड बेस ई-तिकिटिंग मशीन्स खरेदी केल्या आहेत. दरम्यान, ऑनलाईन सेवेत महापालिका काळाच्या खूप मागे असल्याने स्मार्ट सिटी योजनेतून ४२ कोटी रुपये खर्च करून ई-गव्हर्नर्ससाठी निविदा काढली. याशिवाय शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वेगवेगळ्या भागात आकर्षक ‘लव्ह औरंगाबाद’, ‘लव्ह खडकी’ असे बोर्ड उभारण्यात आले. अनेक वर्षांपासून ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी झाली नव्हती. स्मार्ट सिटी योजनेतून ही डागडुजी सुरू करण्यात आली. शहागंज येथील ऐतिहासिक क्लॉक टाॅवरला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम सुरू करण्यात आले.

अडीचशे कोटींचा हिस्सा

१ हजार कोटींच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला स्वतःचा वाटा म्हणून २५० कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. सध्या आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने पुढच्या वर्षी महापालिकेला आपला वाटा टाकण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेने आपला वाटा टाकल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून उर्वरित २५० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत

स्मार्ट सिटी योजनेतून शहर बस सुरू करून पाच वर्षांसाठी आर्थिक तरतूद केली. तत्कालीन आयुक्त डॉक्टर निपुण विनायक यांनी बस खरेदीसाठी पुढाकार घेतला. विद्यमान प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सिटी बस सेवा दहा वर्षे सुरू ठेवण्याचे फेरनियोजन केले आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद वाढण्याचे धोरण स्वीकारले आहे. सर्वसामान्य नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी स्वस्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली. बस खरेदीवर जवळपास ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले.

सफारी पार्कची योजना स्मार्ट सिटीतून

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची जागा अपुरी असल्याने स्मार्ट सिटी योजनेतून सफारी पार्क साकारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने जागा दिली आहे. सफारी पार्कसाठी पहिल्या टप्प्यात १४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्यामुळे हा प्रकल्प नंतर स्मार्ट सिटी योजनेत टाकण्यात आला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांना जंगल सफारीचा आनंद घेता येईल.

‘एमएसआय’ प्रकल्पामुळे शहर सेफ

मास्टर सिस्टिम इंटिग्रेशन या प्रकल्पासाठी १७६ कोटींची तरतूद केली आहे. यातून ७०० सीसीटीव्ही कॅमेरे, ५० डिजिटल डिस्प्ले बोर्ड, महापालिका आणि पोलिस आयुक्तालयात कमांड कंट्रोल सेंटर, वाहतूक नियम फलक व झेब्रा क्रॉसिंग ही कामे होणार आहेत. हा प्रकल्प जवळपास ८० टक्के पूर्ण होत आला आहे. सीसीटीव्हीमुळे पोलिसांना बरीच मदत झाली आहे. गुन्हेगारी कारवायांचे प्रमाण काही अंशी कमी झाले.

मनपासाठी ई-शासन प्रणाली महत्त्वाची

महापालिकेच्या वेगवेगळ्या झोन कार्यालयांमध्ये आजही जन्म व मृत्यू आणि इतर प्रमाणपत्र पुरातन पद्धतीने देण्यात येतात. या योजनांना आता अत्याधुनिक स्वरूप मिळणार आहे. महापालिकेत ई-शासन प्रणाली लागू करण्यासाठी ४२ कोटींची तरतूद केली आहे. यामुळे नागरिकांना विविध सेवांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता येईल. यासाठी मोबाइल ॲप आणि वेबसाईट विकसित केली जाणार आहे.