शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या अवशेषांची ‘स्मार्ट’जपणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जुने औरंगाबाद शहर कोणत्याही हल्ल्यापासून, अतिक्रमणापासून सुरक्षित रहावे म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच वेगवेगळ्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या ...

औरंगाबाद : जुने औरंगाबाद शहर कोणत्याही हल्ल्यापासून, अतिक्रमणापासून सुरक्षित रहावे म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच वेगवेगळ्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या होत्या. शहरीकरणामुळे हा ऐतिहासिक वारसा हळूहळू लुप्त पावत आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनने हा वारसा अत्यंत ‘स्मार्ट’ पद्धतीने जपण्यास सुरुवात केली आहे. नौबत दरवाजा ते काळा दरवाजादरम्यान असलेल्या तटबंदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जुन्या काळाप्रमाणेच आहे.

शहागंज येथील क्लॉक टॉवरच्या डागडुजीचे काम ज्या निकषांप्रमाणे करण्यात आले. तेच निकष किलेअर्कसाठी लावण्यात आले. संरक्षण भिंतीची जुनी माती कोरून काढण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली. डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य कोणते असावे, हे सांगण्यात आले. चुना, विटांचे पावडर, डिंंक, गूळ, वेलपत्ता, मेथी, भेंडी, सिरस आदी साहित्य वाटून घ्यायचे. त्याला महिनाभर भिजायला ठेवायचे. त्यानंतर सर्व साहित्य लोखंडी भांड्यात ठेवून त्याला जाळायचे आणि मगच त्याचा वापर करण्याची मुभा दिली. नौबत दरवाजा परिसरात कंत्राटदाराने साहित्य तयार करण्याची भट्टीच तयार केली. संपूर्ण कामात सिमेंटचा वापर केलेला नाही. या कामामुळे संरक्षण भिंतीचे आयुष्य आणखी १०० वर्षांनी वाढले. नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या रंगरंगोटी करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीकडून या कामावरही सुमारे ३२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील ८ ऐतिहासिक दरवाजांची डागडुजीही २ कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे.

संरक्षण भिंतीचा इतिहास

मुगल राजा औरंगजेब यांनी शहराच्या संरक्षणासाठी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षण भिंती उभ्या केल्या होत्या. प्रत्येक संरक्षण भिंतीला वेगळे नाव होते. शहर पनाह, किलेअर्क फसील (तटबंदी), बायजीपुरा फसील, बेगमपुरा फसील, नौखंडा फसील अशी नावे होती. प्रत्येक तटबंदीचे काही मोजकेच अवशेष आज पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी नागरिकांनी तटबंदी तोडून घरे बांधली आहेत.

स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला

मागील अनेक वर्षांपासून आपण या संरक्षण भिंतीची वाताहत बघत होतो. स्मार्ट सिटीने किमान डागडुजीचा निर्णय घेतला ही आनंदाची बाब आहे. डागडुजीसाठी कोट्यवधींचा निधी लागणार नाही. दीड ते दोन कोटी रुपये खर्च केले तर जिथे जिथे अवशेष आहेत तेथे काम करता येईल.

डॉ. रमजान शेख, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ.