शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या अवशेषांची ‘स्मार्ट’जपणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जुने औरंगाबाद शहर कोणत्याही हल्ल्यापासून, अतिक्रमणापासून सुरक्षित रहावे म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच वेगवेगळ्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या ...

औरंगाबाद : जुने औरंगाबाद शहर कोणत्याही हल्ल्यापासून, अतिक्रमणापासून सुरक्षित रहावे म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच वेगवेगळ्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या होत्या. शहरीकरणामुळे हा ऐतिहासिक वारसा हळूहळू लुप्त पावत आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनने हा वारसा अत्यंत ‘स्मार्ट’ पद्धतीने जपण्यास सुरुवात केली आहे. नौबत दरवाजा ते काळा दरवाजादरम्यान असलेल्या तटबंदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जुन्या काळाप्रमाणेच आहे.

शहागंज येथील क्लॉक टॉवरच्या डागडुजीचे काम ज्या निकषांप्रमाणे करण्यात आले. तेच निकष किलेअर्कसाठी लावण्यात आले. संरक्षण भिंतीची जुनी माती कोरून काढण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली. डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य कोणते असावे, हे सांगण्यात आले. चुना, विटांचे पावडर, डिंंक, गूळ, वेलपत्ता, मेथी, भेंडी, सिरस आदी साहित्य वाटून घ्यायचे. त्याला महिनाभर भिजायला ठेवायचे. त्यानंतर सर्व साहित्य लोखंडी भांड्यात ठेवून त्याला जाळायचे आणि मगच त्याचा वापर करण्याची मुभा दिली. नौबत दरवाजा परिसरात कंत्राटदाराने साहित्य तयार करण्याची भट्टीच तयार केली. संपूर्ण कामात सिमेंटचा वापर केलेला नाही. या कामामुळे संरक्षण भिंतीचे आयुष्य आणखी १०० वर्षांनी वाढले. नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या रंगरंगोटी करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीकडून या कामावरही सुमारे ३२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील ८ ऐतिहासिक दरवाजांची डागडुजीही २ कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे.

संरक्षण भिंतीचा इतिहास

मुगल राजा औरंगजेब यांनी शहराच्या संरक्षणासाठी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षण भिंती उभ्या केल्या होत्या. प्रत्येक संरक्षण भिंतीला वेगळे नाव होते. शहर पनाह, किलेअर्क फसील (तटबंदी), बायजीपुरा फसील, बेगमपुरा फसील, नौखंडा फसील अशी नावे होती. प्रत्येक तटबंदीचे काही मोजकेच अवशेष आज पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी नागरिकांनी तटबंदी तोडून घरे बांधली आहेत.

स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला

मागील अनेक वर्षांपासून आपण या संरक्षण भिंतीची वाताहत बघत होतो. स्मार्ट सिटीने किमान डागडुजीचा निर्णय घेतला ही आनंदाची बाब आहे. डागडुजीसाठी कोट्यवधींचा निधी लागणार नाही. दीड ते दोन कोटी रुपये खर्च केले तर जिथे जिथे अवशेष आहेत तेथे काम करता येईल.

डॉ. रमजान शेख, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ.