शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

डंख छोटा; धोका मोठा

By admin | Updated: April 25, 2016 00:51 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण अशा स्वच्छ पाण्यावर हिवतापाचे डास अंडी घालतात. शिवाय शहरातील विविध भागांमधील नादुरुस्त ड्रेनेजलाईन, साचलेली डबकी, तुंबलेल्या नाल्यांमुळेही डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागतो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना प्रशासनाचे मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.२५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूपासून होतो. हे जंतू अ‍ॅनाफिलिस मादी डासाद्वारे प्रसारित होतात. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना दरवर्षी या रोगाची लागण होते. राज्यात हिवतापाच्या जंतूचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. डासांच्या अळीचे नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची कृती आहे. हिवतापासह डेंग्यू, चिकुन गुनियाचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. सध्या पाणीटंचाईमुळे पाण्याची साठवण करण्यावर नागरिकांचा भर आहे. पाणी वाया न घालता ते अधिक दिवस साठविण्यावर नागरिकांचा भर आहे. परंतु पाणी झाकून न ठेवल्यास त्यावर हिवतापाचे डास अंडी घालण्याची शक्यता असते. साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कूलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या इ. डासांच्या उत्पत्तीची स्थाने म्हणून पाहिली जातात. परंतु शहरात ठिकठिकाणी नादुरुस्त ड्रेनेजलाईन आणि त्यामुळे साचलेली डबकी दिसून येतात. त्याच्या दुरुस्तीकडे अनेक दिवस दुर्लक्ष केले जात असल्याने अशा ठिकाणीही डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. परंतु अशा परिस्थितीकडे प्रशासन गांभीर्याने पाहायला तयार नसल्याचे दिसते. त्यातूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.