शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कडासमोरील झोपा काढा आंदोलन सुरूच

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे

औरंगाबाद : आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन आज सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरूच राहिले. जायकवाडीतून दोन्ही बंधाऱ्यांत पाणी सोडण्याचा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले.आपेगाव आणि हिरडपुरी बंधारे यंदा पावसाळ्यानंतरही रिकामेच आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. म्हणून या बंधाऱ्यांमध्ये जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे; परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यामुळे जायकवाडी पाणी शेतकरी संघर्ष कृती समितीने सोमवारपासून जलसंपदा विभागाच्या निषेधार्थ कडा कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. काल दिवसभर शेकडो शेतकरी दिवसभर आणि रात्रीही कडा कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अंथरूण टाकून झोपले. मोहरमनिमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे आज कडा कार्यालय बंद होते; पण तरीही शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, दिवसभरात गेवराईचे आमदार पवार यांच्यासह अनेकांनी कडा कार्यालयात येऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आ. पवार यांनी जलसंपदामंत्री पंकजा पालवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या मागणीची माहिती दिली. तसेच याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली.जलसंपदा विभागाकडून आज दिवसभरात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आज मंगळवारी रात्रीही शेतकरी कडा कार्यालयासमोरून हलले नव्हते. या आंदोलनात जयाजीराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर औटे, संभाजी काळे, अच्युत औटे, आजमल पठाण, मगबूल पठाण, रामकिसन भावले, किशोर दसपुते, नीलेश दसपुते, सुभान पठाण, महादेव गोर्डे, शंकर गोर्डे, नारायण जाधव, बाळासाहेब जाधव, प्रदीप खरात, सलीम पठाण, अप्पासाहेब भावले, पांडुरंग लांडगे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडावे यासाठी जलसंपदा विभागाकडे आम्ही महिनाभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सुदैवाने यंदा जायकवाडीत पाणी आहे; परंतु तरीही निर्णय होत नाही. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने निर्णय घ्यावा; अन्यथा दुपारनंतर आंदोलनाचे स्वरूप बदलून हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.