शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कडासमोरील झोपा काढा आंदोलन सुरूच

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे

औरंगाबाद : आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन आज सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरूच राहिले. जायकवाडीतून दोन्ही बंधाऱ्यांत पाणी सोडण्याचा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले.आपेगाव आणि हिरडपुरी बंधारे यंदा पावसाळ्यानंतरही रिकामेच आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. म्हणून या बंधाऱ्यांमध्ये जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे; परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यामुळे जायकवाडी पाणी शेतकरी संघर्ष कृती समितीने सोमवारपासून जलसंपदा विभागाच्या निषेधार्थ कडा कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. काल दिवसभर शेकडो शेतकरी दिवसभर आणि रात्रीही कडा कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अंथरूण टाकून झोपले. मोहरमनिमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे आज कडा कार्यालय बंद होते; पण तरीही शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, दिवसभरात गेवराईचे आमदार पवार यांच्यासह अनेकांनी कडा कार्यालयात येऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आ. पवार यांनी जलसंपदामंत्री पंकजा पालवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या मागणीची माहिती दिली. तसेच याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली.जलसंपदा विभागाकडून आज दिवसभरात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आज मंगळवारी रात्रीही शेतकरी कडा कार्यालयासमोरून हलले नव्हते. या आंदोलनात जयाजीराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर औटे, संभाजी काळे, अच्युत औटे, आजमल पठाण, मगबूल पठाण, रामकिसन भावले, किशोर दसपुते, नीलेश दसपुते, सुभान पठाण, महादेव गोर्डे, शंकर गोर्डे, नारायण जाधव, बाळासाहेब जाधव, प्रदीप खरात, सलीम पठाण, अप्पासाहेब भावले, पांडुरंग लांडगे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडावे यासाठी जलसंपदा विभागाकडे आम्ही महिनाभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सुदैवाने यंदा जायकवाडीत पाणी आहे; परंतु तरीही निर्णय होत नाही. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने निर्णय घ्यावा; अन्यथा दुपारनंतर आंदोलनाचे स्वरूप बदलून हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.