शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

जिवंत साठ्याकडे संथ वाटचाल

By admin | Updated: July 29, 2016 01:07 IST

औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे

औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात धरणाच्या मृतसाठ्यात २५७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. तरीदेखील मृतसाठ्यातील संपूर्ण तूट भरून निघण्यासाठी आणखी २३ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. त्यानंतरच धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी भरण्यास सुरुवात होईल. जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच धरणातील जिवंत साठा पूर्णपणे संपला होता. तेव्हापासून पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या मृतसाठ्याची पातळीही २६५ दलघमीने घटली होती. मात्र, जुलै महिन्यात सातत्याने पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणात नियमितपणे पाण्याची आवक होत आहे. महिनाभरात धरणात २५७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे; पण तरीदेखील हे धरण जिवंत साठ्यात आलेले नाही. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत पोहोचली. कडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणात गेल्या चोवीस तासांत १२ दलघमी पाण्याची आवक झाली. परिणामी मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत आली. मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २३ दलघमीची गरज आहे.