शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत साठ्याकडे संथ वाटचाल

By admin | Updated: July 29, 2016 01:07 IST

औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे

औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात धरणाच्या मृतसाठ्यात २५७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. तरीदेखील मृतसाठ्यातील संपूर्ण तूट भरून निघण्यासाठी आणखी २३ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. त्यानंतरच धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी भरण्यास सुरुवात होईल. जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच धरणातील जिवंत साठा पूर्णपणे संपला होता. तेव्हापासून पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या मृतसाठ्याची पातळीही २६५ दलघमीने घटली होती. मात्र, जुलै महिन्यात सातत्याने पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणात नियमितपणे पाण्याची आवक होत आहे. महिनाभरात धरणात २५७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे; पण तरीदेखील हे धरण जिवंत साठ्यात आलेले नाही. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत पोहोचली. कडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणात गेल्या चोवीस तासांत १२ दलघमी पाण्याची आवक झाली. परिणामी मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत आली. मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २३ दलघमीची गरज आहे.