शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

प्रमुख उमेदवारांच्या झोपेचे खोबरे

By admin | Updated: October 12, 2014 00:45 IST

जालना : आपापल्या कार्यक्षेत्रात भल्या सकाळी घराबाहेर पडल्यापासून मध्यरात्री घरी परतेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मात्तबर उमेदवार गेल्या १५ दिवसांपासून अवघ्या २ ते ४ तासांचीच झोप घेत आहेत.

जालना : आपापल्या कार्यक्षेत्रात भल्या सकाळी घराबाहेर पडल्यापासून मध्यरात्री घरी परतेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मात्तबर उमेदवार गेल्या १५ दिवसांपासून अवघ्या २ ते ४ तासांचीच झोप घेत आहेत. या विधानसभा निवडणुका सोप्या नाहीत. विशेषत: प्रस्थापितांकरिता त्या अडचणीच्या ठरल्या आहेत. कारण वर्षानुवर्षांपासून सत्तेत राहिलेल्या या प्रस्थापितांच्या विरोधात नवख्यांनी आव्हाने उभे केली आहेत. त्यांच्या विरोधात गरळ ओकून वातावरण पेटविण्याचा चंग बांधला आहे. भोकरदन, घनसावंगी, जालना या तीन मतदारसंघात हे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे. विशेषत: गावोगाव मोठी प्रचार यंत्रणा, संस्था, संघटनांसह कार्यकर्त्यांची तगडी फौज असतांना सुध्दा या प्रस्थापितांना गावा-गावातील राजकारणावर बारकाईने लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. प्रचार यंत्रणा सहजपणे उभारतांना स्वत: केलेल्या विकास कामांचा डांगोरा पिटावा लागतो आहे. तर स्वकीय पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे दूर करीत कामाला जुंपवितांना पडद्याआडच्या किंवा पडद्यावरच्या घडामोडींसह हालचालींवर बारीक लक्ष ठेवतांना उमेदवारांना नाकीनऊ येत आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच आपापल्या कार्यक्षेत्रात सत्तारुढ विरोधी पक्षाचे हे प्रस्थापित सक्रिय झाले होते. विशेषत: गेल्या महिनाभरापासून या प्रस्थापितांनी प्रचंड मेहनत करीत भक्कम मोर्चेबांधणी केली. गेल्या पंधरा दिवसातून वातावरण पेटविण्यात हे प्रस्थापित यशस्वी झाले. आता चार दिवसांवर लढाई येवून ठेपली आहे. त्यामुळे हे प्रस्थापित सकाळी घराबाहेर पडल्यापासून रात्री उशिरा घरी परतेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. घरी परतल्यानंतर सुध्दा विश्वासू कार्यकर्त्यांच्या गराड्यात हे उमेदवार दिवसभरातील आढाव्यात गुंग होत आहेत. व्यवस्थापनात्मक बाबींसह खर्चाच्या गोष्टीही पडताळत आहेत. मध्यरात्री उशिरात झोप तीही काही तासांचीच असे चित्र आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पहाटे ४ ते ४.३० वाजेपर्यंत उठणे, ५.३० पर्यंत तयार होणे, ६ ते ७ दरम्यान निवासस्थानी किंवा प्रचार कार्यालयांमधून विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर दिवसभराच्या कार्यक्रमांबाबत चर्चेसह नियोजन, ७ वाजता घराबाहेर पडणे, ठरलेले गाव गाठून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर हितगुज, प्रतिष्ठीतांच्या भेटीगाठी, गावातील मैदाने किंवा पारांवर छोटेखानी सभा, गावातून पदयात्रा, तेथून पुढे दुसऱ्या नियोजित गावाकडे प्रस्थान. दुपारी दोन-अडीच पर्यंत किमान सहा गावांना भेटी, कार्यकर्त्यांच्या शेतावर किंवा घरी जेवण, लगेच पुढील गावांना प्रस्थान, रात्री साडेनऊ दहापर्यंत आणखी पाच सहा गावांमधून प्रचार दौरा. ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारांचा हा दिनक्रम तर शहरी भागातील उमेदवार सकाळपासून दुपारपर्यंत ग्रामीण भागात व सायंकाळपासून शहरील विविध वसाहती व कॉलन्यांमधून बैठका, कॉर्नर सभा किंवा पदयात्रा वगैरे दौऱ्यात व्यस्त आहेत.