शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सिल्लोडमधील कत्तलखान्यांना इतके दिवस अभय कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:10 IST

सिल्लोडमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीन कत्तलखान्यांवर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड मारून सुमारे ५० टन मांस जप्त के ले आणि ११५ जनावरांची मुक्तता केली.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिल्लोडमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीन कत्तलखान्यांवर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड मारून सुमारे ५० टन मांस जप्त के ले आणि ११५ जनावरांची मुक्तता केली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असली तरी या कत्तलखान्यांची खबर सिल्लोड पोलिसांना नव्हती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अवैध धंद्याबाबत पोलिसांची एवढी डोळेझाक कोणाच्या इशाºयावरून सुरू होती आणि काल झालेली कारवाई कोणाच्या दबावाखाली करण्यात आली, यावरून आता राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.कोणताही अवैध व्यवसाय चार दिवसांपेक्षा अधिक काळ पोलिसांपासून लपून राहू शकत नाही, असे म्हटल्या जाते. यामुळे अवैध धंदे करणारे प्रथम पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात. नंतरच ते त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा करतात, असे म्हटले जाते. जर हे सत्य असेल तर मग सिल्लोड पोलिसांना या कत्तलखान्यांची माहिती होती, असे म्हणावे लागेल. सिल्लोड येथील तीन कत्तलखान्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी चार कर्मचाºयांसह धाड मारली तेव्हा तेथे सुमारे तीनशेहून अधिक जनावरांची कत्तल केलेली आढळली आणि कत्तलीसाठी आणण्यात आलेली अन्य ११५ जनावरे मिळाली. कत्तलखान्यांत एवढ्या मोठ्या संख्येने आणण्यात येणाºया जनावरांची ने-आण करण्यासाठी ट्रक, टेम्पोचा वापर होतो. एवढेच नव्हे तर जनावरांचे मांस विक्री आॅर्डरप्रमाणे मोठ्या वाहनांतूनच केली जाते. ही वाहतूक नियमितपणे अनेक वर्षांपासून सुरू होती, असे म्हटले जाते. तर मग ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखा, सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिसांना एवढ्या दिवसात मांस आणि जनावरांची वाहतूक करणाºयांवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य गुप्तवार्ता विभागासोबत ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकारी, कर्मचाºयांना याविषयी माहिती मिळाली नसेल तर चिंताजनक आहे. चोरीची जनावरे कत्तलीसाठी वापरल्या जात होती, असे सूत्रांनी सांगितले.अवैध धंद्यांनी गाठला कळस३ ते ४ जनावरे घेऊन जाणा-या वाहनाचा पाठलाग करीत असताना कत्तलखाने मिळाल्याचे पोलिसांचे सांगणे, म्हणजे अवैध धंद्याकडे डोळेझाक करण्याचा बाबतीत पोलिसांनी गाठलेला कळसच आहे.राजकीय कारवाई...सूत्रांनी सांगितले की, हैदराबादेतील आमदार राजासिंह ठाकूर यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली होती. राजकीय श्रेय लाटण्याच्या उद्देशाने सभेवरून वाद निर्माण केला गेला.या सभेच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी कत्तलखान्यांवर धाड मारण्यात आल्याने ही मोठ्या नेत्याच्या इशाºयाने कारवाई झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.