शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

वासराचा फडशा पाडून बिबट्याची पुन्हा ‘सलामी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:33 IST

वन विभागानेही टेकले हात : महिनाभरानंतर वडवाळी परिसरात आगमन

पैठण : वन विभाग व नागपूर येथून बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या विशेष पथकालाही हात टेकवण्यास भाग पाडणाऱ्या बिबट्याने महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा वडवाळी परिसरात वासराचा फडशा पाडून आगमनाची वर्दी दिली आहे. बिबट्याच्या या जबरदस्त ‘सलामी’ने परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग सतर्क झाला आहे. गेवराई तालुक्यातून या बिबट्याचे आगमन झाले असावे, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला असून वन विभाग आता या बिबट्याच्या मागावर आहे. आपली जनावरे सुरक्षित जागेवर बांधावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.पैठण तालुक्यातील आपेगाव, ज्ञानेश्वरवाडी, आखतवाडा, वडवाळी शिवारात महिनाभरापूर्वी धुमाकूळ घालत बिबट्याने शेतकºयांच्या चार जनावरांचा फडशा पाडला होता. वन विभागाने जंगजंग पछाडूनही हा बिबट्या हातात आला नव्हता. शेवटी हा बिबट्या या परिसरातून निघून गेल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मात्र महिनाभरापूर्वी गायब झालेला बिबट्या मंगळवारी पुन्हा अवतरल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वडवाळी येथील शेतकरी बापू साळुंके यांच्या उसात दीड वर्षे वयाच्या वासराचा मंगळवारी रात्री या बिबट्याने फडशा पाडला. सकाळी बापू साळुंके यांना शेतात वासराचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ ही खबर वन विभागाच्या अधिकाºयांना दिली.घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी गोविंद वैद्य, सुधीर धवन, गंगाधर पंडित यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वासराला ठार मारण्याची, मांस खाण्याची पध्दत यावरुन वासराची शिकार बिबट्यानेच केली आहे, असे वन अधिकाºयांनी गावकºयांना सांगितले.महिनाभरापूर्वी या भागात बिबट्याने दहशत माजवली होती. तब्बल दहा ते पंधरा दिवस या परिसरात बिबट्याने मुक्काम ठोकून चार जनावरांचा फडशा पाडला होता.वन विभागाकडून शेतकºयांना नुकसानभरपाईपरिसरातील शेतकरी श्रीराम बनकर, रावसाहेब भुजबळ, तुकाराम खरात व आशा खेडकर या चार शेतकºयांच्या वासराची बिबट्याने शिकार केली होती. झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकरी श्रीराम बनकर यांना ६००० रुपये, रावसाहेब भुजबळ यांना ६००० रुपये, तुकाराम खरात यांना ३७५०रुपये, आशा खेडकर यांना १५,००० रुपये या प्रमाणे वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात आली असून सदरची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे एस. बी. तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी औरंगाबाद यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल