शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सावकारांच्या कर्जाला कंटाळून साठ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST

पाचोड : कर्जबाजारी व व्याजाला कंटाळून विहामांडवा शिवारातील शेतात साठ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. बाळासाहेब विठ्ठलराव आवारे असे ...

पाचोड : कर्जबाजारी व व्याजाला कंटाळून विहामांडवा शिवारातील शेतात साठ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. बाळासाहेब विठ्ठलराव आवारे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी नातेवाईकांच्या शेतात जाऊन बुधवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली.

विहामांडवा येथील रामभाऊ बाळासाहेब आवारे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब विठ्ठलराव आवारे हे शेतकरी असून शेतीव्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ते आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले होते. पण ते दुपारपर्यंत घरी आले नसल्याने रामभाऊ आवारे भावाला सोबत घेऊन वडिलांना शोधण्यासाठी शेतात गेले, पण त्याठिकाणी ते दिसले नाहीत. शोधाशोध केली असता त्यांचे नातेवाईक प्रकाश काकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला बाळासाहेब आवारे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती रामभाऊ आवारे यांनी पाचोड पोलीस स्टेशनला दिली. यावेळी सपोनि अतुल येरमे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मदने, पोलीस जमादार आप्पासाहेब माळी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बाबासाहेब आवारे यांच्या खिशात चिट्ठी सापडली आहे. त्यात मी सावकाराच्या कर्जाला, त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पण आवारे यांनी कुणाकडून कर्ज घेतले होते, त्यांनी कुणामुळे आत्महत्या केली असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. रामभाऊ आवारे यांच्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.