शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

सहा हजार गुरुजींंचा बदल्यांकडे डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:49 IST

सुमारे ६ ते ६.५ हजार शिक्षकांचे बदल्यांकडेच लक्ष असल्यामुळे गुणवत्तेची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा पेच कधी सुटणार, याची चिंता सध्या राज्यभरातील जि.प. गुरुजींना सतावत आहे. गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्रातील विस्थापित होणा-या शिक्षकांसह सुमारे ६ ते ६.५ हजार शिक्षकांचे बदल्यांकडेच लक्ष असल्यामुळे गुणवत्तेची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे.साधारणपणे मेअखेरपर्यंत जि.प. शिक्षकांच्या बदल्या होत असत. यंदा राज्यस्तरावरून आॅनलाइन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. आज-उद्या करीत करीत आॅक्टोबर महिनाही मावळला; परंतु अजूनही बदल्यांसाठी मुहूर्त सापडलेला नाही. बघता बघता पहिले शैक्षणिक सत्र संपून आता दुसरे सत्र सुरू व्हायला पाच- सहा दिवसांचा अवधी आहे. बदलीच्या माध्यमातून आपणास सध्याच्या शाळेला मुकावे लागेल, अशी भीती शिक्षकांमध्ये असून, त्यांचे लक्ष विचलित झालेले आहे. अध्ययन-अध्यापनावर त्यांचे फारसे लक्ष नाही. बदली प्रक्रिया राबविणा-या राज्यस्तरीय समितीकडून सातत्याने आॅनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचा तगादा लावला जात आहे. अनेकदा रात्र रात्र जागूनही बदलीचे पोर्टल ओपन होत नाही. या विवंचनेत शिक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील संवर्ग ४ मधील शिक्षकांसाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची मुदत होती. गंभीर आजार व पती-पत्नी एकत्रीकरण या संवर्ग दोनमधील शिक्षक सोडले, तर अवघड क्षेत्रातील (संवर्ग ३ ) शिक्षक व सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक, बदलीमुळे विस्थापित होणारे शिक्षक, असे मिळून ४ हजार ८७४ पैकी ४ हजार ८४८ शिक्षकांच्या बदल्या होतील, अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी रविंद्र वाणी यांनी व्यक्त केली आहे. तथापि, गंभीर आजारी व पती-पत्नी एकत्रीकरणामुळे हजार-दीड हजार शिक्षकांना बदलीद्वारे सोयीच्या शाळा मिळणार आहेत.गुणवत्तेची ऐसीतैशीशिक्षकांचे दैनंदिन अध्ययन-अध्यापनाकडे लक्ष कमी; पण बदल्यांकडेच लक्ष अधिक, अशी परिस्थिती आहे.