शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

सहा हजार गुरुजींंचा बदल्यांकडे डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:49 IST

सुमारे ६ ते ६.५ हजार शिक्षकांचे बदल्यांकडेच लक्ष असल्यामुळे गुणवत्तेची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा पेच कधी सुटणार, याची चिंता सध्या राज्यभरातील जि.प. गुरुजींना सतावत आहे. गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्रातील विस्थापित होणा-या शिक्षकांसह सुमारे ६ ते ६.५ हजार शिक्षकांचे बदल्यांकडेच लक्ष असल्यामुळे गुणवत्तेची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे.साधारणपणे मेअखेरपर्यंत जि.प. शिक्षकांच्या बदल्या होत असत. यंदा राज्यस्तरावरून आॅनलाइन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. आज-उद्या करीत करीत आॅक्टोबर महिनाही मावळला; परंतु अजूनही बदल्यांसाठी मुहूर्त सापडलेला नाही. बघता बघता पहिले शैक्षणिक सत्र संपून आता दुसरे सत्र सुरू व्हायला पाच- सहा दिवसांचा अवधी आहे. बदलीच्या माध्यमातून आपणास सध्याच्या शाळेला मुकावे लागेल, अशी भीती शिक्षकांमध्ये असून, त्यांचे लक्ष विचलित झालेले आहे. अध्ययन-अध्यापनावर त्यांचे फारसे लक्ष नाही. बदली प्रक्रिया राबविणा-या राज्यस्तरीय समितीकडून सातत्याने आॅनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचा तगादा लावला जात आहे. अनेकदा रात्र रात्र जागूनही बदलीचे पोर्टल ओपन होत नाही. या विवंचनेत शिक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील संवर्ग ४ मधील शिक्षकांसाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची मुदत होती. गंभीर आजार व पती-पत्नी एकत्रीकरण या संवर्ग दोनमधील शिक्षक सोडले, तर अवघड क्षेत्रातील (संवर्ग ३ ) शिक्षक व सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक, बदलीमुळे विस्थापित होणारे शिक्षक, असे मिळून ४ हजार ८७४ पैकी ४ हजार ८४८ शिक्षकांच्या बदल्या होतील, अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी रविंद्र वाणी यांनी व्यक्त केली आहे. तथापि, गंभीर आजारी व पती-पत्नी एकत्रीकरणामुळे हजार-दीड हजार शिक्षकांना बदलीद्वारे सोयीच्या शाळा मिळणार आहेत.गुणवत्तेची ऐसीतैशीशिक्षकांचे दैनंदिन अध्ययन-अध्यापनाकडे लक्ष कमी; पण बदल्यांकडेच लक्ष अधिक, अशी परिस्थिती आहे.