शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सणासुदीत सहा हजार क्विंटल साखरेचा ‘गोडवा’

By admin | Updated: August 13, 2014 00:59 IST

दिनेश गुळवे, बीड सणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे.

दिनेश गुळवे, बीडसणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये सहा हजार क्विंटल साखर आली असून आणखी साठ हजार क्विंटल साखर येणार आहे. एक फेबु्रवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, भरडधान्य लाभार्थ्यांना योग्य किंमतीत मिळू लागले आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अडीच लाख शिधापत्रिकाधारकांना मिळत आहे. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानावर येणारी साखर ठरवून दिलेल्या डिलरकडून दुकानदारांना घ्यावी लागत असे. आता मात्र ही साखरही सरकारी धान्य गोदामातून वितरीत केली जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना येणाऱ्या विविध अडचणी सुटल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसात खुल्या बाजारातील साखरेचे दर कमालीचे वाढले आहेत. साखर ३५ ते ३८ रुपये किलो दराने खुल्या बाजारात मिळत असल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वस्त धान्य दुकानात साखर आल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या श्रावण महिना असून यामध्ये विविध व्रतवैकल्य असतात. तसेच अगामी काळात पोळा, गौरीपूजन, गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळी असे सण आहेत. अशा सणासुदीच्या काळात रेशन दुकानवर साखर येणार असल्याने शिधापत्रिकाधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यासाठी ६ हजार ७४ क्विंटल साखल आली असून ती जिल्ह्यातील विविध शासकीय गोदामातून वितरीत केली जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयातील वखरे यांनी दिली. तसेच अगामी काळात आणखी आठ हजार ३४ क्विंटल साखर येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)