शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गुंठेवारीची घोषणा होऊन सहा महिने झाले तरी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जानेवारी २०२१ मध्ये औरंगाबाद शहरातील गुंठेवारीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची घोषणा केली. ३१ मार्च ...

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जानेवारी २०२१ मध्ये औरंगाबाद शहरातील गुंठेवारीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची घोषणा केली. ३१ मार्च २०२० पर्यंत बांधकाम केलेल्या अनधिकृत मालमत्ता गुंठेवारीत समाविष्ट करण्यात येतील. या निर्णयाचा फायदा सव्वालाख मालमत्ताधारकांना, तर चार लाख नागरिकांना होईल, असेही सांगण्यात आले. या निर्णयानंतर विविध वसाहतींमध्ये राजकीय मंडळींनी जल्लोषही केला. श्रेयासाठी पोस्टरबाजीही केली. मात्र, सहा महिने उलटले तरी गुंठेवारीच्या अंमलबजावणीचा श्रीगणेशाही झालेला नाही.

२०२० पर्यंत बांधण्यात आलेल्या अनधिकृत मालमत्तांना कोणत्या नियमानुसार गुंठेवारीत मंजुरी द्यावी. मालमत्ताधारकांकडून कोणकोणती कागदपत्रे घ्यावीत, दंड किती भरून घ्यावा, याचा कोणताही तपशील आजपर्यंत नगरविकास विभागाने महापालिकेला दिलेला नाही, हे विशेष. शहरात मागील २० वर्षांपासून गुंठेवारीचा प्रश्न प्रलंबित आहे. पूर्वी २००१ पूर्वी बांधकाम असलेल्या मालमत्तांना गुंठेवारीत नियमित करण्यात येत होते. या निर्णयाची ४० टक्केही अंमलबजावणी झाली नाही. मात्र, गुंठेवारीतील ११६ वसाहतींमध्ये शंभर टक्के मूलभूत सोयी- सुविधा देण्याचे काम महापालिकेने केले. ९० टक्के मालमत्ताधारकांनी गुंठेवारीचे उर्वरित पैसे मनपाकडे भरलेच नाहीत.

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ६ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद शहरात २०२० पूर्वी अनधिकृत बांधकाम केलेल्यांना गुंठेवारीत अभय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा सव्वालाख मालमत्ताधारकांना होईल, असे शासनातर्फेच सांगण्यात आले. या निर्णयाचे राजकीय भांडवल शिवसेनेने पूर्णपणे केले. विविध वसाहतींमध्ये फटाके फोडून जल्लोष केला. चौकाचौकांत पोस्टर लावून राज्य शासनाचे आभारही मानले. हे सर्व पाहून अनधिकृत मालमत्ताधारकांनाही हायसे वाटले. आपली मालमत्ता अधिकृत होईल, असे वाटू लागले.

जून महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत यासंदर्भात शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन, अध्यादेश, नियमावली मनपाला देण्यात आलेली नाही. मागील आठवड्यात पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेत गुंठेवारीसंदर्भात लवकरच मनपाला नियमावली प्राप्त होईल, असे सांगितले. मात्र, आजपर्यंत नगरविकास विभागाकडून मनपाला काहीच प्राप्त झालेले नाही.

स्वतंत्र कक्षाची गरज

सव्वालाख मालमत्ता गुंठेवारीत नियमित करून देण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाला तज्ज्ञ अनुभवी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमावे लागतील. मनपा प्रशासनानेही अद्याप यासंदर्भात कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही.

दरपत्रकाची वाट पाहतोय

यापूर्वीही शासनाने मनपाला दरपत्रक निश्चित करून दिले होते. या दरपत्रकातील पन्नास टक्के रक्कम गृहीत धरून मनपाने अंमलबजावणी केली. आताही शासनाकडून गुंठेवारीच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या दरपत्रकाची वाट पाहतोय. लवकरच दरपत्रक प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल.

-जयंत खरवडकर, सहायक संचालक, नगररचना

पी.आर. कार्डची घोषणा हवेतच विरली

गुंठेवारीतील ज्या मालमत्ता शासन नियमानुसार नियमित केल्या आहेत, त्यांना पी.आर. कार्ड देण्याची घोषणाही करण्यात आली होती. महापालिकेने यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहारही सुरू केला होता. मात्र, आजपर्यंत यासंदर्भातही निर्णय झालेला नाही.