शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

सहा महिन्यांत ६१ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या ५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:02 IST

राम शिनगारे औरंगाबाद : अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२० या वर्षात एकूण ९५ मुलींनी ...

राम शिनगारे

औरंगाबाद : अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२० या वर्षात एकूण ९५ मुलींनी पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या. चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ६१ मुली पळून गेल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या पळून गेेलेल्या मुलींपैकी तब्बल ५४ जणींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती सहायक पोलीय आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली.

अल्पवयात भावनिकदृष्ट्या घरातून सहानुभूती किंवा पाठबळ न मिळाल्यास समज नसलेल्या मुली भरकटतात. त्या मुलींना बाहेरून कोणीतरी पाठिंबा देतात. तेव्हा त्या बंड करण्यास तयार होतात. या बंडाच्या माध्यमातूनच पळून जाण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याची कारणे समोर आली आहेत. याशिवाय आई-वडिलांमध्ये असलेला बेबनाव, घरात लक्ष देण्याकडे दुर्लक्ष, मुलांना लागलेली चुकीची संगत आणि घरात विचार व्यक्त करण्याच्या नसलेल्या स्वातंत्र्यामुळे अनेक मुलींमध्ये बंडखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या १२ महिन्यांच्या कालखंडात ९५ मुली पळून गेल्याची आकडेवारी आहे. यापैकी ९२ मुलींना परत पालकांकडे आणण्यात पोलिसांना यश मिळालेले आहे. या वर्षात केवळ तीन मुलींचा शोध घेता आलेला नाही. त्याचवेळी १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालखंडात ६१ मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी ५४ मुलींना शोधण्यात यश प्राप्त झाले. अद्याप ७ मुलींचा शोध सुरू असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आकडेवारी

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०२० : ९५

२०२१ : ६१ (१ जानेवारी ते ३० जून)

उदाहरण १

वास्तव समजल्यास भान येते

शहरातील एक अल्पवयीन आई-वडिलांचा कोणताही विचार न करता प्रेमात आंधळी होऊन पळून जाते. पळून गेल्यानंतर होणाऱ्या छळानंतर तिला मुलासोबत राहवे वाटत नाही. जेव्हा पोलीस पकडून आईवडिलांच्या हवाली करतात, तेव्हा आपण केलेली चूक समजते. तत्काळ मुलाला सोडून आई-वडिलांसोबत राहण्यास होकार देते.

उदाहरण २

स्टंट प्रत्यक्षात कामी येत नाहीत

एक मुलगी स्टंट करण्याऱ्या मुलासोबत पळून जाते. मुलगाही आईवडिलांच्या जिवावर जगत होता. जेव्हा तो एका मुलीला पळवून आणतो. तेव्हा त्याला पैसे असेपर्यंत बरे वाटते. त्यानंतर हाल सुरू होतात. त्याचवेळी पोलीस पकडतात. मुलींना या काळात झालेल्या हालअपेष्टा लक्षात येतात. त्यामुळे स्टंट कामी येत नाहीत, असे म्हणत आई-वडिलांना जवळ करते.

प्रतिक्रिया

मुला-मुलींचे मित्र व्हा

आई-वडिलांनी मुला-मुलींच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. विशेषत: मुलींच्या भावना, अपेक्षा ऐकून घेत त्यावर मत व्यक्त न करता, त्यातून पर्याय शोधला पाहिजे. मुलींच्या मनाप्रमाणे सहज शक्य असणाऱ्या गोष्टी करू देत त्यांची आवड समजून घेतली पाहिजे. मुलगा-मुलगी अशी तुलना न करता मुलींना घरात मानसन्मान दिला पाहिजे. हे करतानाच मुलींच्या वर्तनावरही आईने लक्ष ठेवले पाहिजे. ती कोणाशी बोलते, कोणत्या मैत्रिणी आहेत. ती काय करते यााकडेही लक्ष असले पाहिजे. अलीकडे लॉकडाऊनच्या परिणामामुळेही पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ