शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सहा महिन्यांत ६१ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या ५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:02 IST

राम शिनगारे औरंगाबाद : अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२० या वर्षात एकूण ९५ मुलींनी ...

राम शिनगारे

औरंगाबाद : अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२० या वर्षात एकूण ९५ मुलींनी पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या. चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ६१ मुली पळून गेल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या पळून गेेलेल्या मुलींपैकी तब्बल ५४ जणींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती सहायक पोलीय आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली.

अल्पवयात भावनिकदृष्ट्या घरातून सहानुभूती किंवा पाठबळ न मिळाल्यास समज नसलेल्या मुली भरकटतात. त्या मुलींना बाहेरून कोणीतरी पाठिंबा देतात. तेव्हा त्या बंड करण्यास तयार होतात. या बंडाच्या माध्यमातूनच पळून जाण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याची कारणे समोर आली आहेत. याशिवाय आई-वडिलांमध्ये असलेला बेबनाव, घरात लक्ष देण्याकडे दुर्लक्ष, मुलांना लागलेली चुकीची संगत आणि घरात विचार व्यक्त करण्याच्या नसलेल्या स्वातंत्र्यामुळे अनेक मुलींमध्ये बंडखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या १२ महिन्यांच्या कालखंडात ९५ मुली पळून गेल्याची आकडेवारी आहे. यापैकी ९२ मुलींना परत पालकांकडे आणण्यात पोलिसांना यश मिळालेले आहे. या वर्षात केवळ तीन मुलींचा शोध घेता आलेला नाही. त्याचवेळी १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालखंडात ६१ मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी ५४ मुलींना शोधण्यात यश प्राप्त झाले. अद्याप ७ मुलींचा शोध सुरू असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आकडेवारी

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०२० : ९५

२०२१ : ६१ (१ जानेवारी ते ३० जून)

उदाहरण १

वास्तव समजल्यास भान येते

शहरातील एक अल्पवयीन आई-वडिलांचा कोणताही विचार न करता प्रेमात आंधळी होऊन पळून जाते. पळून गेल्यानंतर होणाऱ्या छळानंतर तिला मुलासोबत राहवे वाटत नाही. जेव्हा पोलीस पकडून आईवडिलांच्या हवाली करतात, तेव्हा आपण केलेली चूक समजते. तत्काळ मुलाला सोडून आई-वडिलांसोबत राहण्यास होकार देते.

उदाहरण २

स्टंट प्रत्यक्षात कामी येत नाहीत

एक मुलगी स्टंट करण्याऱ्या मुलासोबत पळून जाते. मुलगाही आईवडिलांच्या जिवावर जगत होता. जेव्हा तो एका मुलीला पळवून आणतो. तेव्हा त्याला पैसे असेपर्यंत बरे वाटते. त्यानंतर हाल सुरू होतात. त्याचवेळी पोलीस पकडतात. मुलींना या काळात झालेल्या हालअपेष्टा लक्षात येतात. त्यामुळे स्टंट कामी येत नाहीत, असे म्हणत आई-वडिलांना जवळ करते.

प्रतिक्रिया

मुला-मुलींचे मित्र व्हा

आई-वडिलांनी मुला-मुलींच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. विशेषत: मुलींच्या भावना, अपेक्षा ऐकून घेत त्यावर मत व्यक्त न करता, त्यातून पर्याय शोधला पाहिजे. मुलींच्या मनाप्रमाणे सहज शक्य असणाऱ्या गोष्टी करू देत त्यांची आवड समजून घेतली पाहिजे. मुलगा-मुलगी अशी तुलना न करता मुलींना घरात मानसन्मान दिला पाहिजे. हे करतानाच मुलींच्या वर्तनावरही आईने लक्ष ठेवले पाहिजे. ती कोणाशी बोलते, कोणत्या मैत्रिणी आहेत. ती काय करते यााकडेही लक्ष असले पाहिजे. अलीकडे लॉकडाऊनच्या परिणामामुळेही पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ