शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मार्चअखेरीस जिल्ह्यात लागणार सहाशे टँकर

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

औरंगाबाद : खालावलेली भूजल पातळी आणि सिंचन प्रकल्पांमधील अत्यल्प पाणीसाठा यामुळे जिल्ह्यास लवकरच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

औरंगाबाद : खालावलेली भूजल पातळी आणि सिंचन प्रकल्पांमधील अत्यल्प पाणीसाठा यामुळे जिल्ह्यास लवकरच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मार्चअखेरीस तब्बल सहाशे टँकरची गरज भासू शकते, अशी माहिती आज पालकसचिव संजयकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत समोर आली. जिल्ह्याचे पालकसचिव तथा अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरुवातीला टंचाईची सद्य:स्थिती आणि संभाव्य परिस्थितीची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ६२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आॅगस्टपासून पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यात १४ गावांना २२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी आणि लघु व मध्यम प्रकल्पातील अत्यल्प साठा यामुळे येत्या काळात भीषण टंचाई भासणार आहे. मार्चअखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ६०० टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे. १निसर्गाने पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचा पीक पेरणीवरील परिणाम उत्पादकतेच्या स्वरूपात दिसून येतो. म्हणून पावसावर आधारित पीक पेरणीचा कालावधी ठरविल्यास उत्पादनात घट येणार नाही, असे पालकसचिव संजयकुमार म्हणाले. २नेहमी उद्भवणाऱ्या पीक परिस्थितीवर काही उपाययोजना कराव्या लागतील. पिकांना कमी पाण्यात पोषण देणाऱ्या हायड्रोपॉलिमरचा वापर करता येतो का हे पाहावे. हायड्रोपॉलिमर हे जमिनीवर आच्छादले जाते व ते आयात करावे लागेल. ३त्याचप्रमाणे हायड्रोफोनिक्स या तंत्रज्ञानाचा वापर हरितगृहात केल्यास तृणधान्य चांगले घेता येते याचाही वापर करता आल्यास पाहावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.