शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

सहा जणींचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:49 IST

तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत एक वृद्धा दगावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत एक वृद्धा दगावली.कस्तुरवाडी येथे दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी खोलीकरणाचे काम झालेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कपडे धूत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४) गजाला शेख मोईन (१९) व राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने खोल पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी असून सायमा त्यांची मामेबहीण होती. या मुलींना वाचवायच्या प्रयत्नात सीमा शे शब्बीर (१३) हिचाही तोल गेला, मात्र ती सुदैवाने वाचली.घटनेची माहिती मिळताच आ. नारायण कुचे, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे, तहसीलदार प्रवीण पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोहोचले. गावातील समीर पठाण, अय्याज बेग, नौशाद बेग, अखतर पठाण, रऊफ बेग, युसूफ पटेल, सरवर बेग, भानुदास कोल्हे, आरिफ खान, शकील पठाण, अफजल बेग, भाऊसाहेब कोल्हे, अझहर खान पठाण यांच्या मदतीने मुलींचे मृतदेह बाहेर काढले. माजी आ. संतोष सांबरे यांनीही मदतकार्य केले. वरूडी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी भोकरदन ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विजय गायकवाड तपास करीत आहेत.गावातील रऊफ बेग म्हणाले की, मी या तीन मुलींपैकी सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले. त्यावेळी तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती.यावर आमदार निधीतून रुग्णवाहिका देता येत नसेल तर मी वैयक्तिक निधीतून देईन, असे आश्वासन आ. नारायण कुचे यांनी ग्रामस्थांना दिले.वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यूपरतूर : वडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत तोल गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. मृत बहिणींची नावे साक्षी गायकवाड (९) व मीनाक्षी गायकवाड (६) अशी आहेत.केशव गायकवाड हे सकाळी अकरा वाजता शेतातील लिंबाच्या झाडावरील वानरे हाकलत होते. त्या वेळी साक्षी व मीनाक्षी शेतातील विहिरीजवळ उभ्या होत्या. झाडावरून हाकललेली वानरे विहिरीच्या दिशेने पळाली. यामुळे घाबरलेल्या दोघींचा विहिरीत तोल गेला.वडिलांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. नंतर पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक के.के. शेख तपास करीत आहेत. साक्षी व मीनाक्षी या दोघी गावातील शाळेत जातात. रविवार असल्यामुळे त्या सकाळी वडिलांसोबत शेतात गेल्या होत्या. शेतात गेल्या नसत्या तर दोघी वाचल्या असत्या, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.भराडखेडा येथील वृद्धेचा मृत्यूजालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील वृध्देचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गट न ५७ मधे देवूबाई रामभाऊ मुळक (६०) या गवत कापत असताना त्यांचा विहिरीत पडुन मृत्यु झाला. कृष्णा मुरलीधर मुळक यांच्या खबरीवरून बदनापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .