शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहा जनावरे दगावली

By admin | Updated: March 1, 2016 00:39 IST

उस्मानाबाद : एकीकडे भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना रविवारी रात्री झालेल्या अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला़ गारपिट,

उस्मानाबाद : एकीकडे भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना रविवारी रात्री झालेल्या अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला़ गारपिट, वादळी वाऱ्यामुळे ज्वारीसह फळबागांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ तर तीन ठिकाणी वीज पडल्याने सहा जनावरे ठार झाली आहेत़ विशेषत: ज्वारीचा कडबा भिजल्याने उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले असून, पशुपालक अणखी अडचणीत सापडले आहेत़ दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात सरासरी ८़७० मिमी़ पाऊस झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे़मागील वर्षी खरिप पेरणीच्या वेळी पाऊस न पडल्याने ५० टक्क्याहून कमी प्रमाणात पेरणी झाली होती़ त्यानंतरच्या पावसावर काहींनी पेरणी केली़ मात्र, पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला होता़ सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या जीवावर शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली होती़ मात्र, अपुऱ्या ओलीमुळे रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करीत उपलब्ध पाण्यावर ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांची जोपासना केली आहे़ मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली़ बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने ज्वारीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले़ तर अनेक गावातील घरावरील, शाळांवरील पत्रेही उडून गेल्याने संबंधितांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला़वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसात जिल्ह्यात तीन ठिकाणी विजा कोसळल्या़ यात उमरगा शिवारात वीज पडल्याने प्रेमनाथ पांडूरंग सुरवसे यांच्या २ गाई आणि १ वासरू, उमरगा तालुक्यातील कसगी शिवारात वीज पडल्याने गणपती रत्नाजी सुरवसे यांचा १ बैल, तसेच जवळगा बेट येथील माधव दशरथ बिराजदार यांचे २ बैल अशी एकूण ५ मोठी व १ लहान जनावरे वीज पडल्याने मयत झाली़ यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ (प्रतिनिधी)