शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

सहा जनावरे दगावली

By admin | Updated: March 1, 2016 00:39 IST

उस्मानाबाद : एकीकडे भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना रविवारी रात्री झालेल्या अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला़ गारपिट,

उस्मानाबाद : एकीकडे भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना रविवारी रात्री झालेल्या अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला़ गारपिट, वादळी वाऱ्यामुळे ज्वारीसह फळबागांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ तर तीन ठिकाणी वीज पडल्याने सहा जनावरे ठार झाली आहेत़ विशेषत: ज्वारीचा कडबा भिजल्याने उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले असून, पशुपालक अणखी अडचणीत सापडले आहेत़ दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात सरासरी ८़७० मिमी़ पाऊस झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे़मागील वर्षी खरिप पेरणीच्या वेळी पाऊस न पडल्याने ५० टक्क्याहून कमी प्रमाणात पेरणी झाली होती़ त्यानंतरच्या पावसावर काहींनी पेरणी केली़ मात्र, पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला होता़ सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या जीवावर शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली होती़ मात्र, अपुऱ्या ओलीमुळे रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करीत उपलब्ध पाण्यावर ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांची जोपासना केली आहे़ मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली़ बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने ज्वारीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले़ तर अनेक गावातील घरावरील, शाळांवरील पत्रेही उडून गेल्याने संबंधितांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला़वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसात जिल्ह्यात तीन ठिकाणी विजा कोसळल्या़ यात उमरगा शिवारात वीज पडल्याने प्रेमनाथ पांडूरंग सुरवसे यांच्या २ गाई आणि १ वासरू, उमरगा तालुक्यातील कसगी शिवारात वीज पडल्याने गणपती रत्नाजी सुरवसे यांचा १ बैल, तसेच जवळगा बेट येथील माधव दशरथ बिराजदार यांचे २ बैल अशी एकूण ५ मोठी व १ लहान जनावरे वीज पडल्याने मयत झाली़ यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ (प्रतिनिधी)