शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांनाही अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार रस्ते दुरुस्तीची मागणी करू नही रस्ते दुरस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील पोखरी ते साक्षाळपिंप्री या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. पोखरीसह टाकळगव्हाण, खडकी, उक्कडपिंप्री, धारवंटा आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना या रस्त्यावरून मादळमोहीसह गेवराई येथे जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा रात्री-अपरात्री वाहने नादुरुस्तही होत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच; शिवाय वाहनचालकांना नाहक खर्चही सहन करावा लागत आहे. तसेच यामार्गावरून नारायणगड येथे भाविक वाहनांसह पायी दिंंडीनेही जातात. या भाविकांनाही रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी सुनील धस, देवराव जोगदंड, बाळू जोगदंड आदींनी केली आहे.तालुक्यातील उमापूर रस्त्याची गेल्या सहा महिन्यापासून दुरुस्ती सुरू आहे. यासाठी खडी आणलेली आहे. मात्र, काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने प्रवाशांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. हा १८ कि.मी. चा रस्ता आहे. रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी खडी उघडी पडली आहे. रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरच खडी टाकलेली आहे. त्यामुळे ही खडीही इतर रहदारीस अडथळा ठरत आहे. या खडीमुळे अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही येथे झालेल्या आहेत. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती गतीने करावी, अशी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र सदरील काम गतीने करण्यात येत नसल्याने प्रवाशांचे हाल कायमच आहेत. तालुक्यातील रेवकी-देवकी या रस्त्याचीही चाळणी झाली आहे. तलवाडा रोेड ते अंतर्गत रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या रस्त्यावरून शेतकरी दररोज शेतात जातात तसेच आपला शेतीमाल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात. खराब रस्त्यामुळे बैलगाडी कशी हाकावी असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडत आहे. मन्यारवाडी, राहेरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार होत आहे. मात्र, सदरील कामास अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याने ग्रामस्थांचे हाल कायम आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी किसन काशीद, देविदास भोसले, भाऊसाहेब माखले आदींनी केली आहे. तालुक्यातील रस्त्यांबाबत उपअभियंता आर. एन. वाघमारे म्हणाले, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मंजूर झाल्यानंतर रस्ते दुरुस्ती करू. (वार्ताहर)