शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांनाही अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार रस्ते दुरुस्तीची मागणी करू नही रस्ते दुरस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील पोखरी ते साक्षाळपिंप्री या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. पोखरीसह टाकळगव्हाण, खडकी, उक्कडपिंप्री, धारवंटा आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना या रस्त्यावरून मादळमोहीसह गेवराई येथे जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा रात्री-अपरात्री वाहने नादुरुस्तही होत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच; शिवाय वाहनचालकांना नाहक खर्चही सहन करावा लागत आहे. तसेच यामार्गावरून नारायणगड येथे भाविक वाहनांसह पायी दिंंडीनेही जातात. या भाविकांनाही रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी सुनील धस, देवराव जोगदंड, बाळू जोगदंड आदींनी केली आहे.तालुक्यातील उमापूर रस्त्याची गेल्या सहा महिन्यापासून दुरुस्ती सुरू आहे. यासाठी खडी आणलेली आहे. मात्र, काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने प्रवाशांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. हा १८ कि.मी. चा रस्ता आहे. रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी खडी उघडी पडली आहे. रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरच खडी टाकलेली आहे. त्यामुळे ही खडीही इतर रहदारीस अडथळा ठरत आहे. या खडीमुळे अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही येथे झालेल्या आहेत. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती गतीने करावी, अशी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र सदरील काम गतीने करण्यात येत नसल्याने प्रवाशांचे हाल कायमच आहेत. तालुक्यातील रेवकी-देवकी या रस्त्याचीही चाळणी झाली आहे. तलवाडा रोेड ते अंतर्गत रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या रस्त्यावरून शेतकरी दररोज शेतात जातात तसेच आपला शेतीमाल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात. खराब रस्त्यामुळे बैलगाडी कशी हाकावी असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडत आहे. मन्यारवाडी, राहेरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार होत आहे. मात्र, सदरील कामास अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याने ग्रामस्थांचे हाल कायम आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी किसन काशीद, देविदास भोसले, भाऊसाहेब माखले आदींनी केली आहे. तालुक्यातील रस्त्यांबाबत उपअभियंता आर. एन. वाघमारे म्हणाले, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मंजूर झाल्यानंतर रस्ते दुरुस्ती करू. (वार्ताहर)