शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:03 IST

आडूळ : रस्त्यामध्ये कुठे मोठमोठे दगड, कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी यामुळे मृतदेहाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुढे ब्राह्मणगाव ...

आडूळ : रस्त्यामध्ये कुठे मोठमोठे दगड, कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी यामुळे मृतदेहाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुढे ब्राह्मणगाव तांड्यावर जाऊच शकत नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी रस्त्यातच थांबून ठिय्या दिला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन कशीबशी रुग्णवाहिका तांड्यावर पोहोचती केली.

ब्राह्मणगाव तांडा येथील रहिवासी एकनाथ रूपा जाधव (४६) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी गावी आणले जात होते. रुग्णवाहिका ब्राह्मणगावात आल्यानंतर पुढे तांड्यावर कशी न्यायची, असा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावरून कुठे गुडघ्याएवढे तर कुठे कमरेपर्यंत पावसाचे पाणी वाहत होते. शिवाय रस्त्यात जागोजागी मोठाले दगड पडलेले असल्याने रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता, त्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येथून मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा घेऊन तेथेच ठिय्या दिला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना याबाबत माहिती पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली व तीन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी परिश्रम घेत दगड, माती बाजूला करून रुग्णवाहिकेला तात्पुरती वाट तयार करून दिली.

चौकट

आश्वासन पाळले नाही तर गुरुवारी आंदोलन

ब्राह्मणगाव ते ब्राह्मणगाव तांडा या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. विशेष म्हणजे आडूळ ते ब्राह्मणगाव तांडा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपासून एका गुत्तेदाराला दिलेले आहे. ते अद्यापही पूर्ण झाले नाही. थोडा जरी पाऊस झाला तरी ब्राह्मणगाव तांड्याचा इतर गावांशी संपर्क तुटतो. रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला नाही, तर गुरुवारी (दि. १६) सकाळी औरंगाबाद- बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोर बंजारा ब्रिगेड व संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

फोटो :

100921\img-20210910-wa0070.jpg

रुग्णवाहिकेला तांड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने,ग्रामस्थांनी परिश्रम घेत रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करुन दिली.