शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

जिल्ह्यातील रस्त्यांवर वाजतोय ३३८ रुग्णवाहिकांचा ‘सायरन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहरातील असो की, जिल्ह्यातील रस्ते, अवघ्या काही मिनिटांत एकामागून एक सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिका पाहायला मिळत आहेत. ...

औरंगाबाद : शहरातील असो की, जिल्ह्यातील रस्ते, अवघ्या काही मिनिटांत एकामागून एक सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिका पाहायला मिळत आहेत. कोरोनामुळे रुग्णवाहिकांची गरज आणखीच वाढली आहे. रुग्णांचा जीव वाचविण्याबरोबर चार पैसे मिळण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात १६ नव्या रुग्णवाहिका रस्त्यावर आल्या. आजघडीला जिल्ह्यातील रस्त्यांवर ३३८ रुग्णवाहिकांचा ‘सायरन’ वाजत आहे.

अपघात असो की अन्य काही आपत्कालीन परिस्थिती, अशावेळी गरजू रुग्णाला कमीतकमी वेळेत रुग्णालयात पोहोचविणे गरजेचे असते. अशावेळी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका निभावतात. गोल्डन अवरमध्ये प्रत्येकाला उपचार मिळावेत, यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकाचालक प्रयत्न करीत असतो. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. अशावेळी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करता येते. गरजूंना मोफत सुविधा देता येते. त्याबरोबर काही पैसेही हातात पडतात, या भावनेने वर्षभरात १६ रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल झाल्या. गतवर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रस्त्यावर अवघ्या काही मिनिटांनी रुग्णवाहिकांचा आवाज ऐकायला मिळत होता. त्यानंतर हा आवाज कमी झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांत रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज पुन्हा एकदा सतत ऐकायला मिळत आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात गेल्या वर्षभरात १६ नव्या रुग्णवाहिकांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिकांची संख्या ३३८ आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.

७ वर्षांनंतर सुधारित भाडेदर निश्चित

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात रुग्णवाहिकेचे भाडेदर ७ वर्षांपूर्वी निश्चित केलेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ९ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित केले. मनपा हद्दीत २५ किमी अथवा २ तासांसाठी वाहनाच्या प्रकारानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. तर मनपा क्षेत्राच्या बाहेर प्रतिकिमी दर ठरविण्यात आले आहेत.