शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

साहेब, पकडलेले उंदीर सोडायला गेलो होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : संचारबंदी असताना बाहेर पडण्यासाठी कोण कोणते कारण सांगेल याची कल्पना पोलिसांनाही येऊ शकत नाही. विनाकारण बाहेर पडलेल्या ...

औरंगाबाद : संचारबंदी असताना बाहेर पडण्यासाठी कोण कोणते कारण सांगेल याची कल्पना पोलिसांनाही येऊ शकत नाही. विनाकारण बाहेर पडलेल्या एकाने चक्क पकडलेले उंदीर सोडण्यासाठी घराबाहेर पडल्याचे अजब कारण क्रांती चौक पोलिसांना सांगितले. त्याचे हे कारण पोलिसांना न पटल्याने त्याला ५०० रुपये दंड करण्यात आला.

क्रांती चौक ठाण्याचे फौजदार गायकवाड, हवालदार योगेश नाईक आणि कर्मचारी औरंगपुऱ्यात तैनात होते. यावेळी त्यांनी एका दुचाकीस्वाराला अडवले. संचारबंदीचे नियम मोडून कुठे फिरत आहात, असे पोलिसांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे अजब कारण पोलिसांना सांगितले. त्याचे हे उत्तर ऐकून पोलीस अचंबित झाले. घरात खूप उंदीर झाल्यामुळे उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. यात दोन उंदीर अडकले होते. हे उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे तो म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.

वाढत्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण राज्यात काल रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत फिरणारे बहुतेक नागरिक दवाखान्यात जात आहे, किराणा सामान आणण्यासाठी निघालो, तर काही जण गळ्यात ओळखपत्र अडकून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याची बतावणी पोलिसांना करताना दिसले. संचारबंदीचा आज पहिला दिवस. संचारबंदी मोडून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले. यामुळे सकाळपासून पोलीस आयुक्तांसह दोन उपायुक्त आणि सर्व ठाणेदार फौजफाट्यासह विविध रस्त्यांवर उतरले होते. आकाशवाणी चौकात पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रखरखत्या उन्हात नागरिकांवर कारवाई केली.

उपायुक्त खाटमोडे, एसीपी वानखेडे कारवाईत सहभागी

दिवसभरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक जी. एच. दराडे क्रांती चौकात होते. हर्सूल टी पॉइंट येथे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी कारवाई केली.

चौकट

पिळदार मिशांमुळे मास्क नाही

आजच्या कारवाईदरम्यान एक जण त्याच्या पिळदार मिशा इतरांना दिसाव्यात म्हणून तो विनामास्क दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्यांना थांबवून दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दम्याचा त्रास आहे. श्वास गुदमरत असल्याने मास्क काढल्याचे दुचाकीस्वाराचे म्हणणे होते.

कोट...

दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक; रिक्षाचालकांवर कारवाई

दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यास रिक्षाचालकांना मनाई आहे. या नियमाला पायदळी तुडवत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर यावेळी पोलिसांनी कारवाई केली.