शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सिंगल बातम्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:05 IST

औरंगाबाद : स्नेहनगर येथे पक्षीमित्र रमेश राऊत व छगनसिंग राजपूत यांनी टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांना पाण्याचा कृत्रिम हौद आणि अन्नासाठी ...

औरंगाबाद : स्नेहनगर येथे पक्षीमित्र रमेश राऊत व छगनसिंग राजपूत यांनी टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांना पाण्याचा कृत्रिम हौद आणि अन्नासाठी लोखंडी स्टँड तयार केले आहे. तंत्र संघटनेचे सचिव गणेश पवार व क्रांती चौक ठाण्याचे फौजदार गजानन सोनटक्के यांच्या हस्ते धान्य व पाणी टाकून जागतिक चिमणी दिन साजरा केला. या वेळी ॲड. संतोष मेने, सिडको पोलीस ठाण्याचे फौजदार रतन डोईफोडे, वन विभागाचे गोविंद वैद्य, उल्हास नाईक, सुभाष काकडे, अमित नाईक, गौरव सोनटक्के, मंजुश्री डोईफोडे, रिद्धी राजपूत, संगीता राऊत आदींची उपस्थिती होती.

लॉकडाऊनमध्येही लोकांची रात्री रस्त्यावर गर्दी

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शहरात रात्रीचा अंशत: लॉकडाऊन केला आहे. परंतु, नागरिकांकडून स्थानिक प्रशासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे. बिनधास्तपणे नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नंदनवन कॉलनीतील माऊली चौकात भावसिंगपुऱ्याकडे जाणाऱ्या २० ते २५ वाहनधारकांना पोलिसांनी अडवून ठेवले होते.

‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रमाची नोंदणी सुरु

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला जाणार असून १ एप्रिलपासून या अभ्यासक्रमाची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती केली जाणार आहे.

शांतीपुऱ्यात चुकीच्या ठिकाणी गतिरोधक

औरंगाबाद : लिटिल फ्लाॅवर स्कूल ते नंदनवन कॉलनीपर्यंत सिमेंटचा रस्ता असून मागील चार- पाच दिवसांपूर्वी या रस्त्यावर शांतीपुरा येथे चुकीच्या ठिकाणी डांबराचे गतिरोधक करण्यात आले आहे. एक तर हे गतिरोधक लिटिल फ्लाॅवर शाळेमागे वळणावर अथवा बिल्डर्स सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी उभारले, असते तर वाहनांचा वेग कमी होऊन संभाव्य अपघात रोखता येऊ शकला असता, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

कमी दाबाने नळाला पाणी

औरंगाबाद : अलीकडे नंदनवन कॉलनी, संगिता कॉलनी, न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळनगर, पद्मपाणी सोसायटी, बिल्डर्स सोसायटी, वसुंधरा कॉलनी आदी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना ६ दिवसआड व तोही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण पसरले आहे.