शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

टँकरच्या मापामध्ये पाप

By admin | Updated: April 25, 2016 00:42 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात टंचाई परिस्थिती असल्याने ९०० टँकरद्वारे जिल्ह्याला पाणीपुरवठा होत आहे. या स्थितीचा फायदा घेऊन दहा टन पाण्याचे टँकर चौदा टन दाखवून

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यात टंचाई परिस्थिती असल्याने ९०० टँकरद्वारे जिल्ह्याला पाणीपुरवठा होत आहे. या स्थितीचा फायदा घेऊन दहा टन पाण्याचे टँकर चौदा टन दाखवून बिले उचलली जात असल्याचा प्रकार जिल्ह्यात घडत आहे. याशिवाय जी.पी.एस.च्या प्रिंट न काढताच बिले उचलण्यासाठी काही ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आजघडीला साडेअकराशे गावांमध्ये ९०० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अशा परिस्थितीचा फायदा जिल्ह्यातील काही ठेकेदार घेत आहेत. याबाबत बीड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद लोढा यांनी गत आठवड्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे.जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, वडवणी, परळी या तालुक्यांमध्ये ठेकेदार उद्भवावर पाणी न भरता जवळच्याच एखाद्या खाजगी शेतकऱ्याच्या बोअरवरून पाणी भरत आहेत व दूरचे अंतर कागदोपत्री दाखवले जात आहे, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती असतानादेखील याकडे डोळेझाक केली जात असल्याने महिनाकाठी कोट्यवधी रुपयांचा गंडा ठेकेदार शासनाला घालत आहेत.