शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जिल्ह्यात राबविणार रेशीम अभियान...!

By admin | Updated: March 6, 2017 00:44 IST

जालना : रेशीम मार्केटच्या प्रस्तावानंतर आता जिल्ह्यातील तुती (रेशीम) लागवडीत वाढ व्हावी म्हणून ३७ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली

जालना : रेशीम मार्केटच्या प्रस्तावानंतर आता जिल्ह्यातील तुती (रेशीम) लागवडीत वाढ व्हावी म्हणून ३७ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून रेशीमचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. पारंपरिक पिकासोबतच नगदी व कमी वेळेत व जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून तुती लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. यामुळेच जालना येथे रेशीम क्लस्टची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. याविषयी अधिक माहिती देताना रेशीमचे प्रादेशिक उपसंचालक दिलीप हाके म्हणाले, मार्केटसोबतच रेशीम क्षेत्र वाढाविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. जालना जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी ३७ गट कार्यरत आहेत. एक गटात दहा ते बारा शेतकरी आहेत. मराठवाड्यात ३ हजार ९०० एकर एवढे तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार शेतकरी व तेवढेच शेतकरी व रेशीम व्यावसायिक जोडलेले गेलेले आहेत. शेतकऱ्यांना रेशीम शेती व तुती लागवडीसाठी लागणारी माहिती, अनुदान व प्रशिक्षण जिल्हा कार्यालयातून देण्यात येत असून, शेतकरी गटाच्या माध्यमातून याचा विस्तार होत आहे. तुती पिकाची १७ ते २० दिवसांत वाढ होते. अल्प दिवसांत येणाऱ्या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड करावी म्हणून संपूर्ण जिल्हाभरात रेशीम शेती अभियान राबविण्यात येणार आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून, जिल्ह्यात १५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रेशीम शेती करण्यात येते. जालना येथे होत असलेल्या रेशीम मार्केटचा विकास व्हावा या उद्देशासाठी रेशीम अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. रेशीम उत्पादन वाढल्यास त्याची विक्री थेट जालन येथील बाजारपेठेत करण्यात येणार आहे. सोबतच उत्पादन वाढीमुळे कर्नाटक राज्यातील व्यापारी रेशीम कोष खरेदीसाठी जालना बाजारपेठेत येऊन महसुलात वाढ होऊन शेतकऱ्यांचा याचा फायदा होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करीत आहेत. वर्ष अखेरी रेशीम क्लस्टर सुरू होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)