शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कुंभेफळला ‘रॅडिको’च्या दूषित पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:03 IST

शेंद्रा औद्योगिक परिसरातील रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीने नाल्यामध्ये सोडलेले रसायनमिश्रित लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कुंभेफळ व परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये शिरले असून नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक परिसरातील रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीने नाल्यामध्ये सोडलेले रसायनमिश्रित लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कुंभेफळ व परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये शिरले असून नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रसायनमिश्रित पाणी सोडण्यास कंपनीला तात्काळ प्रतिबंध करावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली.दोन वर्षांपूर्वी रॅडिको डिस्टिलरीजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याविरुद्ध ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी आपली कंपनी स्वत:हून बंद करावी, असे आदेश रॅडिको डिस्टिलरीजच्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते.कंपनी बंद केली नाही, तर कंपनीविरुद्ध जलकायद्यानुसार कारवाई केली जाईल, तसेच कंपनीला केला जाणारा वीज पुरवठाही बंद करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. दरम्यान, महिनाभरासाठीच कंपनी बंद केली. मात्र, कंपनीने ‘ट्रिटमेंट प्लाँट’ सुरू केल्यानंतर उत्पादन प्रक्रिया पूर्ववत झाली. प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून घातक रसायनयुक्त पाण्याचे शुद्धीकरण केले जात होते; परंतु ऐन पावसाळ्यात कंपनीद्वारे रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया न करताच ते मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये सोडून देण्यात आले. यंदाही कंपनीने दूषित लाल रंगाचे पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये सोडून दिल्यामुळे कुंभेफळ गाव व लगतच्या दहा ते पंधरा गावांमध्ये हे पाणी शिरले असून नागरिकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. जवळपास २० ते २४ नागरिकांना ‘पोलिओ’ सारख्या रोगाची बाधा झाली आहे. हे पाणी पिल्यामुळे अनेक जनावरे मरण पावली आहेत. दुर्गंधीयुक्त वास आणि घातक लाल रंगाच्या रसायनयुक्त पाण्यामुळे कुंभेफळ आणि लगतच्या गावांतील नागरिक तसेच जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.कुंभेफळ व लगतच्या शिवारातील विहिरी, हातपंप, तलावांमध्ये घातक रसायनयुक्त लालरंगाचे पाणी आले आहे. कुंभेफळ गावाला औद्योगिक परिसराने पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली असली, तरी जनावरांना मात्र विहिरी किंवा नदी-नाल्याच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.सदरील कंपनीला तात्काळ प्रतिबंधित करावे, अशी मागणी सुधीर मुळे, ज्ञानेश्वर शेळके, बंडू शेळके, दादाराव शेळके, अशोक भावले, बाळू गोजे, शोभा गोजे, प्रल्हाद गावडे, कल्याण कुबेर, भाऊराव शिंदे, कैलास कैलकर आदी नागरिकांनी केलीआहे.