शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सिद्धार्थ,स्पृहाने मारल्या सखींशी ‘गप्पा-टप्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:26 IST

औरंगाबाद : आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हसरी, अवखळ,

औरंगाबाद : आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हसरी, अवखळ, गुणवंत अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी मंगळवारी शहरातील शेकडो सखींशी मनमुराद ‘गप्पा-टप्पा’ मारल्या. निमित्त होते लोकमत सखी मंचतर्फे या सिनेतारकांसोबत आयोजित केलेल्या ‘गप्पा टप्पा’ या कार्यक्रमाचे. यावेळी या जोडीने आपल्या चित्रपटातील अनेक पैलू सखींसमोर उलगडले.‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित या कार्यक्रमास अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह लेखक,दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांना बघण्याची , भेटण्याची आणि त्यांच्याशी ‘गप्पा टप्पा’ मारून त्यांना अनुभवण्याची संधी यानिमित्ताने तमाम सखींना मिळाली.ज्याच्याशी मनमुराद बोलावे वाटते, ज्याला काही तरी सांगावे वाटते,अशा व्यक्तींच्या भावनांची गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी नावावरून चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दीदेखील वाढत आहे. मात्र, या गर्दीत माणसं एकाकी होत आहेत. अशा एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवे असते त्याचा एकटेपणा दूर करणारा, त्याला समजून घेणारा. सिद्धार्थ आणि स्पृहा यांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटातील याच विषयाशी, त्यातील भूमिका आणि चित्रपटातून मिळणारा संदेश याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.यावेळी सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, काही तरी गमावल्यानंतरही त्याविषयी सांगितले जात नाही. ते सर्व मनात साचून राहते. त्यातूनच दडपण निर्माण होते. आई आणि मुलींनी एकमेकांशी काही गोष्टी आवर्जून शेअर केल्या पाहिजे. आपण एकमेकांसाठी खास आहोत, हे दाखविले पाहिजे,असे तो म्हणाला.स्पृहा जोशी म्हणाली, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक मित्र असतात. मात्र, धावपळीच्या युगात एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. प्रत्येक जण कधीना कधी एकटा पडतो. अशावेळी त्यास केवळ सहानुभूती न देता त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला त्याच्या क्षमता सांगितल्या पाहिजे. जर कोणाला एकटे वाटत असेल त्यास वेळीच मदत केली पाहिजे,असे स्पृहा जोशी म्हणाली. ऋतुराज धालगडे म्हणाले, एकटेपणा जाणवतो, तेव्हा कोणीतरी आपले मन जाणून घ्यावेसे वाटते. हीच थीम चित्रपटात आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची भेट सखी मंचच्या सदस्यांसाठी ही जणू पर्वणीच ठरली. यावेळी नीता पानसरे यांनी या कलावंतांची मुलाखत घेतली.