शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

सिद्धार्थ,स्पृहाने मारल्या सखींशी ‘गप्पा-टप्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:26 IST

औरंगाबाद : आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हसरी, अवखळ,

औरंगाबाद : आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हसरी, अवखळ, गुणवंत अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी मंगळवारी शहरातील शेकडो सखींशी मनमुराद ‘गप्पा-टप्पा’ मारल्या. निमित्त होते लोकमत सखी मंचतर्फे या सिनेतारकांसोबत आयोजित केलेल्या ‘गप्पा टप्पा’ या कार्यक्रमाचे. यावेळी या जोडीने आपल्या चित्रपटातील अनेक पैलू सखींसमोर उलगडले.‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित या कार्यक्रमास अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह लेखक,दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांना बघण्याची , भेटण्याची आणि त्यांच्याशी ‘गप्पा टप्पा’ मारून त्यांना अनुभवण्याची संधी यानिमित्ताने तमाम सखींना मिळाली.ज्याच्याशी मनमुराद बोलावे वाटते, ज्याला काही तरी सांगावे वाटते,अशा व्यक्तींच्या भावनांची गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी नावावरून चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दीदेखील वाढत आहे. मात्र, या गर्दीत माणसं एकाकी होत आहेत. अशा एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवे असते त्याचा एकटेपणा दूर करणारा, त्याला समजून घेणारा. सिद्धार्थ आणि स्पृहा यांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटातील याच विषयाशी, त्यातील भूमिका आणि चित्रपटातून मिळणारा संदेश याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.यावेळी सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, काही तरी गमावल्यानंतरही त्याविषयी सांगितले जात नाही. ते सर्व मनात साचून राहते. त्यातूनच दडपण निर्माण होते. आई आणि मुलींनी एकमेकांशी काही गोष्टी आवर्जून शेअर केल्या पाहिजे. आपण एकमेकांसाठी खास आहोत, हे दाखविले पाहिजे,असे तो म्हणाला.स्पृहा जोशी म्हणाली, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक मित्र असतात. मात्र, धावपळीच्या युगात एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. प्रत्येक जण कधीना कधी एकटा पडतो. अशावेळी त्यास केवळ सहानुभूती न देता त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला त्याच्या क्षमता सांगितल्या पाहिजे. जर कोणाला एकटे वाटत असेल त्यास वेळीच मदत केली पाहिजे,असे स्पृहा जोशी म्हणाली. ऋतुराज धालगडे म्हणाले, एकटेपणा जाणवतो, तेव्हा कोणीतरी आपले मन जाणून घ्यावेसे वाटते. हीच थीम चित्रपटात आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची भेट सखी मंचच्या सदस्यांसाठी ही जणू पर्वणीच ठरली. यावेळी नीता पानसरे यांनी या कलावंतांची मुलाखत घेतली.