शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भाववाढीला जनतेने कायदेभंगाने उत्तर द्यावे का?

By admin | Updated: June 24, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे.

औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे. आता जनतेला कायदेभंग करून फुकटात प्रवास करण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. या जुलमी भाडेवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ‘कॉफी वुईथ स्टुडंटस्’ या कार्यक्रमानिमित्त आव्हाड शहरात आले असता, त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे भाडेवाढीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकार नेहमी गोरगरिबांच्या हिताचा विचार करीत होते. त्या सरकारने दरवाढ, भाडेवाढ केली तरी ती सर्वसामान्यांना जाचक ठरेल, अशी केलीनाही. भाजपा मात्र भारतासोबत नव्हे तर इंडियासोबत आहे. त्याचमुळे त्यांनी ही अमानवी दरवाढ केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, एकनाथ गवळी, रामनाथ पाटील, सुधाकर बागूल, अभिषेक देशमुख, सुरजितसिंग खुंगर आदींची उपस्थिती होती. भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांनी भाडेवाढीवर ‘चांगल्या गोष्टींसाठी किंमत मोजावीच लागते’ असे टिष्ट्वट केल्याचे सांगून आव्हाड म्हणाले की, भाजपाने आता अच्छे दिनला प्राईस टॅग लावला असून हे चांगले दिवस आणण्यासाठी केलेल्या जाहिरातीची खर्चवसुली सुरू केली आहे. त्यामुळे जनता आता फुकटातच प्रवास करील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फुकटातच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या भाडेवाढीचे समर्थन करताना हा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता, असे भाजपावाले सांगत आहेत, असे सांगून आव्हाड म्हणाले की, यूपीएच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडले नाही. जुन्या सरकारचे निर्णय खोडून काढायला तुम्हाला कोणी रोखले आहे.एकही जागा कमीहोऊ देणार नाहीराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५०० जागा कमी करण्याचा निर्णय एमसीआयने घेतला आहे; परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातील एकही जागा कमी होणार नाही, याची हमी मी देतो, असे सांगून आव्हाड म्हणाले की, प्राध्यापकांच्या रिक्त जागा ३० दिवसांत भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. ज्या सुविधांची कमतरता आहे, त्या पूर्ण करू. राज्यातील एकही जागा कमी होणे हा आपला अवमानच ठरेल.आम्हाला जागा वाढवून हव्यातकाँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत जागा वाटपाचा २००९ चा फॉर्म्युला असेल का, असे विचारता त्यांनी आम्हाला आता जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे उत्तर दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार काय, असे विचारता त्यांनी उत्तर देणे टाळले.