शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

रेल्वे भाववाढीला जनतेने कायदेभंगाने उत्तर द्यावे का?

By admin | Updated: June 24, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे.

औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे. आता जनतेला कायदेभंग करून फुकटात प्रवास करण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. या जुलमी भाडेवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ‘कॉफी वुईथ स्टुडंटस्’ या कार्यक्रमानिमित्त आव्हाड शहरात आले असता, त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे भाडेवाढीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकार नेहमी गोरगरिबांच्या हिताचा विचार करीत होते. त्या सरकारने दरवाढ, भाडेवाढ केली तरी ती सर्वसामान्यांना जाचक ठरेल, अशी केलीनाही. भाजपा मात्र भारतासोबत नव्हे तर इंडियासोबत आहे. त्याचमुळे त्यांनी ही अमानवी दरवाढ केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, एकनाथ गवळी, रामनाथ पाटील, सुधाकर बागूल, अभिषेक देशमुख, सुरजितसिंग खुंगर आदींची उपस्थिती होती. भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांनी भाडेवाढीवर ‘चांगल्या गोष्टींसाठी किंमत मोजावीच लागते’ असे टिष्ट्वट केल्याचे सांगून आव्हाड म्हणाले की, भाजपाने आता अच्छे दिनला प्राईस टॅग लावला असून हे चांगले दिवस आणण्यासाठी केलेल्या जाहिरातीची खर्चवसुली सुरू केली आहे. त्यामुळे जनता आता फुकटातच प्रवास करील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फुकटातच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या भाडेवाढीचे समर्थन करताना हा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता, असे भाजपावाले सांगत आहेत, असे सांगून आव्हाड म्हणाले की, यूपीएच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडले नाही. जुन्या सरकारचे निर्णय खोडून काढायला तुम्हाला कोणी रोखले आहे.एकही जागा कमीहोऊ देणार नाहीराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५०० जागा कमी करण्याचा निर्णय एमसीआयने घेतला आहे; परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातील एकही जागा कमी होणार नाही, याची हमी मी देतो, असे सांगून आव्हाड म्हणाले की, प्राध्यापकांच्या रिक्त जागा ३० दिवसांत भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. ज्या सुविधांची कमतरता आहे, त्या पूर्ण करू. राज्यातील एकही जागा कमी होणे हा आपला अवमानच ठरेल.आम्हाला जागा वाढवून हव्यातकाँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत जागा वाटपाचा २००९ चा फॉर्म्युला असेल का, असे विचारता त्यांनी आम्हाला आता जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे उत्तर दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार काय, असे विचारता त्यांनी उत्तर देणे टाळले.