शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रेल्वे भाववाढीला जनतेने कायदेभंगाने उत्तर द्यावे का?

By admin | Updated: June 24, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे.

औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे. आता जनतेला कायदेभंग करून फुकटात प्रवास करण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. या जुलमी भाडेवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ‘कॉफी वुईथ स्टुडंटस्’ या कार्यक्रमानिमित्त आव्हाड शहरात आले असता, त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे भाडेवाढीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकार नेहमी गोरगरिबांच्या हिताचा विचार करीत होते. त्या सरकारने दरवाढ, भाडेवाढ केली तरी ती सर्वसामान्यांना जाचक ठरेल, अशी केलीनाही. भाजपा मात्र भारतासोबत नव्हे तर इंडियासोबत आहे. त्याचमुळे त्यांनी ही अमानवी दरवाढ केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, एकनाथ गवळी, रामनाथ पाटील, सुधाकर बागूल, अभिषेक देशमुख, सुरजितसिंग खुंगर आदींची उपस्थिती होती. भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांनी भाडेवाढीवर ‘चांगल्या गोष्टींसाठी किंमत मोजावीच लागते’ असे टिष्ट्वट केल्याचे सांगून आव्हाड म्हणाले की, भाजपाने आता अच्छे दिनला प्राईस टॅग लावला असून हे चांगले दिवस आणण्यासाठी केलेल्या जाहिरातीची खर्चवसुली सुरू केली आहे. त्यामुळे जनता आता फुकटातच प्रवास करील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फुकटातच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या भाडेवाढीचे समर्थन करताना हा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता, असे भाजपावाले सांगत आहेत, असे सांगून आव्हाड म्हणाले की, यूपीएच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडले नाही. जुन्या सरकारचे निर्णय खोडून काढायला तुम्हाला कोणी रोखले आहे.एकही जागा कमीहोऊ देणार नाहीराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५०० जागा कमी करण्याचा निर्णय एमसीआयने घेतला आहे; परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातील एकही जागा कमी होणार नाही, याची हमी मी देतो, असे सांगून आव्हाड म्हणाले की, प्राध्यापकांच्या रिक्त जागा ३० दिवसांत भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. ज्या सुविधांची कमतरता आहे, त्या पूर्ण करू. राज्यातील एकही जागा कमी होणे हा आपला अवमानच ठरेल.आम्हाला जागा वाढवून हव्यातकाँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत जागा वाटपाचा २००९ चा फॉर्म्युला असेल का, असे विचारता त्यांनी आम्हाला आता जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे उत्तर दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार काय, असे विचारता त्यांनी उत्तर देणे टाळले.