शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील चौकांचे सुशोभीकरण ठरतेय अल्पजीवी!

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

जालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या निधीतून सुशोभीकरणही करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या विशेष निधीतून त्यांचे सुशोभीकरणही करण्यात आले. मात्र, तेही अल्पजीवी ठरल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे खाजगी संस्था वा कंपन्यांनी स्वनिधीतून केलेले काही चौकांचे सुशोभीकरण आजही सुस्थितीत आहे, हे विशेष! जालना नगरपालिकेतर्फे जवळपास तीन वर्षांपूर्वी विशेष निधीतून वेगवेगळ्या चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मोठा गाजावाजा करून हाती घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्व बाजुनी मार्बल फर्शी बसविण्यात आली. पुतळ्याच्या चारही बाजूंनी कारंजे लावून हॉयमास्ट दिवे लावण्यात आले. सुशोभीकरणाच्या या कामावर तब्बल वीस लाखांचा निधी खर्च झाला. लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत या कामांचे थाटात उद्घाटनही झाले. त्यानंतर मात्र या कामाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत मार्बल फर्शी फुटली आहे, तर काही भागातील फर्शी चक्क चोरुन नेण्यात आली. तीन वर्षांत केवळ चार ते पाच वेळा चालू करण्यात आलेले कारंजे सध्या बंदावस्थेत आहेत. कारंजाच्या गोलाकार हौदातील पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यातील विद्युत मोटारी नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. हायमास्ट दिवेही अधूनमधून बंदच असतात. शहराचा मध्यवर्ती भागात असलेल्या जनार्धन मामा नागापूरकर चौकाची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. सुशोभीकरण करताना चोहोबाजूंनी बसविलेले स्टीलरॉडही गायब आहेत. तर मार्बल फर्शी काढून नेण्यात आली आहे. शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसिरातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कॉलेज रोडवरील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याचे सुरक्षाद्वारच गायब असून, साफसफाई अभावी आतील बाजूस कचरा साचला आहे. रंगरंगोटी नसल्याने पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. मंमादेवी मंदिरास लागून असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या सुरक्षा भितींचे गेट गायब आहे. तर बाजूलाच असलेल्या संविधान स्तंभाचीदेखभाल दुरुस्तीअभावी दुरावस्था झाली आहे. रेल्वेस्थानक चौकातील स्वामी विवेकानंद पुतळा परिसर तर समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. पुतळ्याच्या सर्वच बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संरक्षणद्वार गायब झाल्यामुळे त्या ठिकाणी तार लावण्यात आली आहे. नियमित साफसफाई व देखभाल दुरुस्ती अभावी स्वामी विवेकानंद पुतळा परिसराची चकमच हरवली आहे. माळीपुऱ्यातील अण्णा भाऊ साठे पुतळ्याचे सुरक्षा गेट तुटले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातील हायमास्ट दिवे बंद आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील अन्य महापुरुषांचे पुतळे व चौकांचा परिसर समस्यांच्या गर्तेत आहे. शहरातील सामाजिक संस्थानी काही चौकांचे सुशोभीकरण केले आहे. या कामांची स्थिती चांगली असल्याचे आढळून आले.