शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

शहरातील चौकांचे सुशोभीकरण ठरतेय अल्पजीवी!

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

जालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या निधीतून सुशोभीकरणही करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या विशेष निधीतून त्यांचे सुशोभीकरणही करण्यात आले. मात्र, तेही अल्पजीवी ठरल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे खाजगी संस्था वा कंपन्यांनी स्वनिधीतून केलेले काही चौकांचे सुशोभीकरण आजही सुस्थितीत आहे, हे विशेष! जालना नगरपालिकेतर्फे जवळपास तीन वर्षांपूर्वी विशेष निधीतून वेगवेगळ्या चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मोठा गाजावाजा करून हाती घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्व बाजुनी मार्बल फर्शी बसविण्यात आली. पुतळ्याच्या चारही बाजूंनी कारंजे लावून हॉयमास्ट दिवे लावण्यात आले. सुशोभीकरणाच्या या कामावर तब्बल वीस लाखांचा निधी खर्च झाला. लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत या कामांचे थाटात उद्घाटनही झाले. त्यानंतर मात्र या कामाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत मार्बल फर्शी फुटली आहे, तर काही भागातील फर्शी चक्क चोरुन नेण्यात आली. तीन वर्षांत केवळ चार ते पाच वेळा चालू करण्यात आलेले कारंजे सध्या बंदावस्थेत आहेत. कारंजाच्या गोलाकार हौदातील पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यातील विद्युत मोटारी नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. हायमास्ट दिवेही अधूनमधून बंदच असतात. शहराचा मध्यवर्ती भागात असलेल्या जनार्धन मामा नागापूरकर चौकाची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. सुशोभीकरण करताना चोहोबाजूंनी बसविलेले स्टीलरॉडही गायब आहेत. तर मार्बल फर्शी काढून नेण्यात आली आहे. शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसिरातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कॉलेज रोडवरील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याचे सुरक्षाद्वारच गायब असून, साफसफाई अभावी आतील बाजूस कचरा साचला आहे. रंगरंगोटी नसल्याने पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. मंमादेवी मंदिरास लागून असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या सुरक्षा भितींचे गेट गायब आहे. तर बाजूलाच असलेल्या संविधान स्तंभाचीदेखभाल दुरुस्तीअभावी दुरावस्था झाली आहे. रेल्वेस्थानक चौकातील स्वामी विवेकानंद पुतळा परिसर तर समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. पुतळ्याच्या सर्वच बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संरक्षणद्वार गायब झाल्यामुळे त्या ठिकाणी तार लावण्यात आली आहे. नियमित साफसफाई व देखभाल दुरुस्ती अभावी स्वामी विवेकानंद पुतळा परिसराची चकमच हरवली आहे. माळीपुऱ्यातील अण्णा भाऊ साठे पुतळ्याचे सुरक्षा गेट तुटले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातील हायमास्ट दिवे बंद आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील अन्य महापुरुषांचे पुतळे व चौकांचा परिसर समस्यांच्या गर्तेत आहे. शहरातील सामाजिक संस्थानी काही चौकांचे सुशोभीकरण केले आहे. या कामांची स्थिती चांगली असल्याचे आढळून आले.