शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

शहरातील चौकांचे सुशोभीकरण ठरतेय अल्पजीवी!

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

जालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या निधीतून सुशोभीकरणही करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या विशेष निधीतून त्यांचे सुशोभीकरणही करण्यात आले. मात्र, तेही अल्पजीवी ठरल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे खाजगी संस्था वा कंपन्यांनी स्वनिधीतून केलेले काही चौकांचे सुशोभीकरण आजही सुस्थितीत आहे, हे विशेष! जालना नगरपालिकेतर्फे जवळपास तीन वर्षांपूर्वी विशेष निधीतून वेगवेगळ्या चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मोठा गाजावाजा करून हाती घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्व बाजुनी मार्बल फर्शी बसविण्यात आली. पुतळ्याच्या चारही बाजूंनी कारंजे लावून हॉयमास्ट दिवे लावण्यात आले. सुशोभीकरणाच्या या कामावर तब्बल वीस लाखांचा निधी खर्च झाला. लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत या कामांचे थाटात उद्घाटनही झाले. त्यानंतर मात्र या कामाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत मार्बल फर्शी फुटली आहे, तर काही भागातील फर्शी चक्क चोरुन नेण्यात आली. तीन वर्षांत केवळ चार ते पाच वेळा चालू करण्यात आलेले कारंजे सध्या बंदावस्थेत आहेत. कारंजाच्या गोलाकार हौदातील पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यातील विद्युत मोटारी नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. हायमास्ट दिवेही अधूनमधून बंदच असतात. शहराचा मध्यवर्ती भागात असलेल्या जनार्धन मामा नागापूरकर चौकाची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. सुशोभीकरण करताना चोहोबाजूंनी बसविलेले स्टीलरॉडही गायब आहेत. तर मार्बल फर्शी काढून नेण्यात आली आहे. शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसिरातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कॉलेज रोडवरील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याचे सुरक्षाद्वारच गायब असून, साफसफाई अभावी आतील बाजूस कचरा साचला आहे. रंगरंगोटी नसल्याने पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. मंमादेवी मंदिरास लागून असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या सुरक्षा भितींचे गेट गायब आहे. तर बाजूलाच असलेल्या संविधान स्तंभाचीदेखभाल दुरुस्तीअभावी दुरावस्था झाली आहे. रेल्वेस्थानक चौकातील स्वामी विवेकानंद पुतळा परिसर तर समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. पुतळ्याच्या सर्वच बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संरक्षणद्वार गायब झाल्यामुळे त्या ठिकाणी तार लावण्यात आली आहे. नियमित साफसफाई व देखभाल दुरुस्ती अभावी स्वामी विवेकानंद पुतळा परिसराची चकमच हरवली आहे. माळीपुऱ्यातील अण्णा भाऊ साठे पुतळ्याचे सुरक्षा गेट तुटले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातील हायमास्ट दिवे बंद आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील अन्य महापुरुषांचे पुतळे व चौकांचा परिसर समस्यांच्या गर्तेत आहे. शहरातील सामाजिक संस्थानी काही चौकांचे सुशोभीकरण केले आहे. या कामांची स्थिती चांगली असल्याचे आढळून आले.