शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

संभ्रमामुळे दिवसभर दुकाने उघड- बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : संचारबंदी बुधवारी रात्री ८ वाजेपासून लागणार मग पुढील ३० तारखेपर्यंत दुकाने बंद राहणार . यामुळे बुधवारी दुकाने ...

औरंगाबाद : संचारबंदी बुधवारी रात्री ८ वाजेपासून लागणार मग पुढील ३० तारखेपर्यंत दुकाने बंद राहणार . यामुळे बुधवारी दुकाने उघडण्यास परवानगी आहे की, नाही याबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्टीकरण न आल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

बुधवारी सकाळी बाजारपेठेतील बहुतांश दुकाने उघडली होती. मात्र, जसे पोलीस फाटा रस्त्यावर उतरला तसे पटापट दुकानाचे शटर खाली झाले पण पोलीस जाताच पुन्हा शटर वरती होऊन व्यवसाय सुरू केला जात होता. असे अनेकदा घडले.

संभ्रमावस्थेमुळे काही भागात दुकाना सुरू होत्या काही भागात बंद असल्याचे दिसून आले. पैठणगेट रस्त्यावर दुपारी हातगाडीवर कपडे विक्री सुरू झाली होती, काही कपड्याच्या दुकानाचे शटर अर्धवट वरती करण्यात आले होते. येथे पोलीस येताच दुकाने बंद झाली, हातगाड्यावाल्यांनाही हाकलण्यात आले. शहागंजमध्ये कपडे खरेदीसाठी हातगाड्यांवर महिलांची गर्दी दिसून आली.

पेट्रोल पंपावरही गर्दी दिसून आली. सिडको, हडको, जवाहर कॉलनी, जालनारोड, गारखेडा परिसर, शिवाजीनगर या भागातील अनेक दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते, काही दुकानाचे शटर खाली होते पण ग्राहक आला की, त्यास शटर वर करून दुकानात पाठवले जात व पुन्हा शटर वरती केले जात होते. सरकारी आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट

शुक्रवारच्या बैठकीत व्यापाऱ्यांची ठरणार भूमिका

महाराष्ट्र चेंबरची ऑनलाईन बैठक बुधवारी पार पडली. सरकारने संपूर्ण लॉकडाऊन न केल्याबद्दल सर्व जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या संचारबंदी निर्णय विरोधात पुण्यातील व्यापारी संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र चेंबरची बैठक होणार असून त्यात पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार आहे, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.