शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी वसाहतीत नगरसेवकांची ‘दुकानदारी’

By admin | Updated: March 18, 2016 00:19 IST

औरंगाबाद : शहरातील सुमारे १२५ गुंठेवारी वसाहतींतील घरे नियमित करून देण्याच्या नावाखाली काही वॉर्डांत नगरसेवकांनीच ‘दुकानदारी’ सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद : शहरातील सुमारे १२५ गुंठेवारी वसाहतींतील घरे नियमित करून देण्याच्या नावाखाली काही वॉर्डांत नगरसेवकांनीच ‘दुकानदारी’ सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता मनपाने कुणालाही अधिकृतपणे गुंठेवारीतील घरांच्या संचिका तयार करण्याचे कंत्राट दिलेले नाही. त्यामुळे शहरातील अनेक गुंठेवारी वसाहतींमध्ये सुरू असलेला हा प्रकार बोगसगिरी असून त्यात गुंठेवारीतील गोरगरीब नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसगत होण्याची शक्यता आहे. पालिकेतील काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने वॉर्डामध्ये गुंठेवारी नियमित करून देण्यासाठी दुकाने सुरू झाली आहेत. यामध्ये १३०० रुपये नागरिकांना संचिका तयार करून देण्यासाठी घेतले जात आहेत. २०० रुपये आर्किटेक्ट शुल्क म्हणून घेतले जात आहेत. एका वसाहतीतून ५०० संचिका संकलित झाल्या तरी ४५ वॉर्डातून २२ हजार ५०० संचिकांचा व्यवहार होईल. प्रत्येक संचिका १५०० रुपये दर धरला तर ३ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची ही रक्कम मनपाला मिळणार की दलाल गिळणार, असा प्रश्न आहे. संचिका तयार करताना संबंधित आर्किटेक्ट घर न पाहता नकाशा तयार करून त्यावर सही शिक्का देतो. हा एकप्रकारचा गुन्हाच म्हणावा लागेल. ४०० रुपयांचे मुद्रांक तयार करून देण्यासाठी घेतले जात आहेत. मनपाने असा कुठलाही आदेश काढलेला नाही. काही ‘राजाश्रित’ दलालांच्या घरी पालिकेचे चालान बुक पोहोचले आहेत. १३६ रुपये ५० प्रति चौ.मी. याप्रमाणे २० बाय ३० च्या घराला ६० चौ.मी. याप्रमाणे ८ हजार १९० रुपयांचे चालान दलाल देत आहेत. अतिरिक्त आयुक्त म्हणाले... मनपाने कुठल्याही संस्था अथवा राजकीय पदाधिकाऱ्याला गुंठेवारी वसाहतींतील घरे नियमित करण्याच्या कामाप्रकरणी सूचना किंवा आदेश दिलेले नाहीत. नागरिकांची फसगत झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही. नागरिकांनी वॉर्ड कार्यालयात चौकशी करूनच गुंठेवारी घराबाबत निर्णय घ्यावा. आता कुठे गेले ते आदेश?मनपा निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री रामदास कदम यांनी गुंठेवारी वसाहतींसाठी तातडीचा शासकीय आदेश आणला. त्या आदेशाचे जाहीर वाचन करून त्यांनी गुंठेवारी वॉर्डातील अनेक सभा जिंकल्या.शासनाने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला आहे. परंतु त्यात गुंठेवारी वसाहतींबाबत कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे २००१ नंतरच्या वसाहतींचे आणि घरांचे नियमितीकरण नेमके कसे होणार, याबाबत साशंकता आहे.