शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडून ६ लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: August 7, 2014 01:15 IST

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले.

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.जालना येथील रहिवासी सराफा व्यापारी राजेश बाबूराव लोळगे यांची शेलगावात लोळगे ज्वेलर्स ही सोन्याचांदीचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लोळगे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्याचांदीचे दागिने असा वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला.लोळगे हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले. दुकान उघडल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त झालेले पाहून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. त्यावर पोलिस निरीक्षक पंकज जाधव, फौजदार राजपूत, कॉ. शिवनकर आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच जालना येथून श्वानपथकासही पाचरण करण्यात आले. श्वानाने जालना मार्गावर गावाच्या मुख्यरस्त्याच्या कमानीपर्यंत माग काठून तेथेच घुटमळले. चारीच्या या घटनेमुळे शेलगाव ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.(वार्ताहर)जिल्ह्यात बुधवारी रात्री शेलगावच्या सराफा दुकानासह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. जालना शहरातील गांधीनगरातील संतोष घुले यांच्या घरी झालेल्या चोरीत ११ हजाराचे संसार उपयोगी साहित्य चोरून नेले. कुंभारपिंपळगाव ता घनसावंगी येथील बीएसएलच्या टावरवरील ५४ हजार रूपये किमतीच्या ६ बॅटऱ्या चोरून नेल्या, तर धावडा ता. भोकरदन येथील राजू देशमुख यांच्या टेम्पोचे २२ हजार रूपये किमतीचे टायर चोरट्यांनी चोरून नेले.४मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. काही दिवसापूर्वीच जालना- औरंगाबाद ग्रामीण बँक फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. बँकेच्या तीन कुलूपे तोडल्यानंतर सायरनचा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. तसेच गावातील बैल, विहिरीवरील मोटारींच्या चोरीच्या घटनाही झालेल्या आहेत. गावात पोलिस चौकी स्थापन करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.